शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

राज्यभरात नियोजन समित्यांना एक रुपयाचाही निधी नाही, विकासकामांच्या फाईली मंजुरीच्या प्रतीक्षेत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 20, 2025 11:54 IST

मार्चनंतर तिजोरीत खडखडाट, सोमवारी नियोजनची सभा

इंदुमती गणेशकोल्हापूर : राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विकास कामांसाठी निधी देणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या तिजोरीतच गेल्या तीन महिन्यांपासून खडखडाट आहे. मार्चनंतर कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील ३६ पैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला राज्य शासनाकडून एक रुपयाचाही निधी आलेला नाही. अन्यथा मे महिना अखेरपर्यंत समितीकडे ३० टक्के निधी वर्ग झालेला असतो. यंदा मात्र निधीची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यातील रस्त्यांपासून सभागृह, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, नावीन्यपूर्ण योजनांसाठी सर्व शासकीय विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी वितरित केला जातो. जिल्हा वार्षिक योजनेतून हा निधी खर्च होतो. सन २०२४-२५ या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी शासनाकडून आलेला सर्व मंजूर निधी समितीमार्फत खर्च करण्यात आला आहे. ३१ मार्चला सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र गेल्या तीन महिन्यात म्हणजेच सन २०२५-२६ या नव्या आर्थिक वर्षातील विकास कामांसाठी शासनाकडून एक रुपयाचाही निधी वर्ग झालेला नाही. त्यामुळे सध्या नियोजन समितीत कमालीची शांतता आहे.

कारणांवरच चर्चानिधी वितरणासाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत असल्याची चर्चा आहे. पण हा लाडक्या बहिणीचाही परिणाम असल्याचे बोलले जाते. विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी कारण समजत नाही; पण सध्या फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले.

  • कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर वार्षिक निधी : ६४२ कोटी
  • डोंगरी विकास उपक्रमांसाठीचा निधी : २१ कोटी
  • आमदार फंड : प्रत्येकी ५ कोटी

डोंगरी विकासचा ३० टक्के निधी आलाच नाही..जिल्ह्यातील डोंगरी विकास उपक्रमांतर्गत २१ कोटींचा निधी समितीला मंजूर आहे. मात्र गेल्यावर्षी फक्त १४ कोटी ७० लाख रुपये आले. उरलेले ७ कोटी रुपये विभागाला मिळालेच नाहीत.

सोमवारी नियोजनची सभाकोल्हापुरातील जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी (दि. २३) होत आहे. यावेळी निधी अजून का आला नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी खर्च झालेल्या निधीला, मागील इतिवृत्ताला मंजुरी दिली जाईल. आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवरूनच बऱ्याचदा सभेत खडाजंगी होते. जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांची मुंबईला बदली झाल्याने त्यांचा पदभार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्याकडे आहे. निधी नसलेल्या समितीत नुसती वाळलेली चर्चाच होणार आहे.

राज्य सरकार दिवाळखोरीकडे निघाल्याचेच हे लक्षण आहे. मंजूर निधीपैकी ६० टक्के निधीच खर्च करण्याचा आदेश अगोदरच आला आहे. नियोजनमधून पुरेसा निधी उपलब्ध झाला असता तर पावसाळ्यापूर्वीच कामे सुरू झाली असती; परंतु आता निवडणुका तोंडावर ठेवून निधी सोडला जाऊ शकतो. - सतेज पाटील, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते