शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - प्रकाश बेलवाडे; कार्यकारी संचालक म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:53 IST

२०२१-२२ आर्थिक वर्षात चुकीचा कारभाराचा आरोप

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात २०२१-२२ या आर्थिक वर्षांत अनेक खरेदीमध्ये बेकायदेशीरपणा असल्याचे चाचणी व विशेष लेखापरीक्षणात निदर्शनास आल्यानंतर संबंधित लेखापरीक्षकांनी कारवाई करणे अपेक्षित होते. पण, त्यांनी पाठीशी घातल्याने याविरोधात सर्किट बेंचमध्ये सोमवारी याचिका दाखल केली असून दोषींकडून वसुली करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केल्याची माहिती वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बेलवाडे म्हणाले, संचालक मंडळाने २०२१-२२ मध्ये दूध संस्था देण्यात येणाऱ्या गवत कांड्या खरेदी २५ पैशांऐवजी ४० पैशांनी केली आहे. ७ लाखांच्या देणग्या जिल्ह्यात दिल्या आहेत, दूध कॅन रिपेअरीचा ठेका जादा दराने दिला आहे. मुंबईतील ‘गोकुळ शॉपी’ ला सरसकट ३२ हजार रुपये सजावटीसाठी दिले आहेत. एका दूध संस्थेला वासाच्या दुधापोटी १ लाख रुपये दिले. कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटी रुपये खेळते भांडवल म्हणून दिले आहे. याविरोधात एका संचालकांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केल्यानंतर चाचणी व विशेष लेखापरीक्षण झाले. पण, त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने न्यायालयात दाद मागितली.कायद्याचे पालन करूनच ‘गोकुळ’चा कारभार : योगेश गोडबोलेकोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा कारभार कायद्याचे पालन करूनच सुरु असून, २०२१-२२ मध्ये झालेल्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार चौकशीला संघाने सर्व सहकार्य केल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली.डॉ. गोडबोले म्हणाले, संघाच्या २०२१-२२ या वैधानिक लेखापरीक्षणाबाबत शासनाकडे तक्रार झाली होती, या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे अधिकारबाह्य आदेश दिले होते. याविरोधात संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संघाने चाचणी लेखापरीक्षणास पूर्ण सहकार्य करुन कायद्यातील तरतुदीनुसार सर्व पूर्तता करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार संघाने लेखापरीक्षणास सर्वतोपरी सहकार्य केले आहे.कायद्याने अपेक्षित असलेली प्रत्येक बाब पूर्णत्वास नेण्यात आलेली असून, त्याबाबत शासनासही वेळोवेळी कळविण्यात आले आहे. संघ हा नेहमीच पारदर्शकतेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करत असून, कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. ‘गोकुळ’ हा शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्यरत असून, पुढेही कायद्याचे व न्यायालयाचे सर्व निर्देश पाळत पारदर्शकतेने व उत्तरदायित्वाने कारभार केला जाईल, असे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.