शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

शिक्षक ते शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व; कोल्हापूरच्या मातीशी नाते : आयुष्याचा देदीप्यमान आलेख प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणणारी व्यक्ती असाच डॉ. अरुण निगवेकर यांच्या आयुष्याचा देदीप्यमान आलेख आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कोल्हापूरशी जोडलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाला. कोल्हापूरच्या मातीला अभिमान वाटावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

निगवेकर कुटुंबीय मूळचे शेती करायचे; परंतु त्यांच्या आजोबांना आपल्या मुलांनी निगवे सोडून इतरत्र जावे व शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे वाटे. निगवेकर यांचे वडील त्याकाळी इंजनिअरिंगचे पदवीधर होते. साधारणत: १९४० ते ५० पर्यंतचा हा काळ होता. निगवेकर कुटुंबीय त्याकाळी शाहूपुरी चौथ्या गल्लीत राहायचे. त्यांचे शिक्षण बँच राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबद्दल कमालीची ओढ होती. त्याकाळी ते मुलांना इंग्रजी वृत्तपत्र आणून वाचायला देत असत. गॅसबत्तीभोवती चार भावंडांसोबत निगवेकर अभ्यास करून शिकले. राजाराम महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. तिथे विज्ञान विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दोन वर्षे पुढील शिक्षणासाठी दरमहा ६० रुपये शिष्यवृत्ती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून दिली जात असे. त्या आर्थिक मदतीतून ते पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. झाले. राजाराम महाविद्यालयातील इंग्रजीचे भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. व्ही.के. गोकाक, ज्ञानपीठ विजेते वि.स. खांडेकर व ज्येष्ठ साहित्यिक ना.सी. फडके यांचा निगवेकर यांच्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला. त्यांनी शिक्षण हेच जीवनाचे आव्हान मानले. शिक्षक होणे हे त्यांना नेहमीच आव्हानात्मक वाटले म्हणूनच त्यांनी हे क्षेत्र उत्साहाने निवडले. त्यांना पदवीला ५८.५० टक्के गुण होते. छत्रपती घराण्याने शिष्यवृत्ती दिल्यानेच आपल्याला पुणे येथील शिक्षणाची कवाडे उघडी झाली व त्यातूनच पुढे जगभरातील संधीची कवाडे खुली झाली, अशी त्यांची भावना होती. त्यांनी उत्तम संशोधन केले. शिक्षण क्षेत्रात सर्वोच्चस्थानी असलेल्या युनेस्को या संस्थेशीही ते अनेक वर्षे जोडले होते. डॉ. निगवेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे देशासाठी मैलाचा दगड ठरावा इतके मोलाचे होते. शिक्षण क्षेत्रात पाच दशके विविध बदल घडविणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षणाचा दर्जा आणि संख्यात्मक सुधारणा यावर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

नॅकच्या स्थापनेत योगदान

पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते; परंतु सुरुवातीला ते शिक्षणमंत्री होते. कॅनडाहून त्यांनी जी. राम रेड्डी यांना यूजीसीचे अध्यक्ष म्हणून बोलावले. जेव्हा डॉ. निगवेकर यांनी नॅकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला ते बांधील राहिले. निगवेकर यांनीच नॅकची निर्मिती करण्याचे आव्हान स्वीकारावे, अशी त्यांनी जबरदस्तीच केली. नॅशनल ॲससेमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) हे नावही निगवेकर यांनीच सुचविले आहे.