शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक ते शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व; कोल्हापूरच्या मातीशी नाते : आयुष्याचा देदीप्यमान आलेख प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणणारी व्यक्ती असाच डॉ. अरुण निगवेकर यांच्या आयुष्याचा देदीप्यमान आलेख आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कोल्हापूरशी जोडलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाला. कोल्हापूरच्या मातीला अभिमान वाटावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

निगवेकर कुटुंबीय मूळचे शेती करायचे; परंतु त्यांच्या आजोबांना आपल्या मुलांनी निगवे सोडून इतरत्र जावे व शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे वाटे. निगवेकर यांचे वडील त्याकाळी इंजनिअरिंगचे पदवीधर होते. साधारणत: १९४० ते ५० पर्यंतचा हा काळ होता. निगवेकर कुटुंबीय त्याकाळी शाहूपुरी चौथ्या गल्लीत राहायचे. त्यांचे शिक्षण बँच राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबद्दल कमालीची ओढ होती. त्याकाळी ते मुलांना इंग्रजी वृत्तपत्र आणून वाचायला देत असत. गॅसबत्तीभोवती चार भावंडांसोबत निगवेकर अभ्यास करून शिकले. राजाराम महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. तिथे विज्ञान विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दोन वर्षे पुढील शिक्षणासाठी दरमहा ६० रुपये शिष्यवृत्ती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून दिली जात असे. त्या आर्थिक मदतीतून ते पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. झाले. राजाराम महाविद्यालयातील इंग्रजीचे भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. व्ही.के. गोकाक, ज्ञानपीठ विजेते वि.स. खांडेकर व ज्येष्ठ साहित्यिक ना.सी. फडके यांचा निगवेकर यांच्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला. त्यांनी शिक्षण हेच जीवनाचे आव्हान मानले. शिक्षक होणे हे त्यांना नेहमीच आव्हानात्मक वाटले म्हणूनच त्यांनी हे क्षेत्र उत्साहाने निवडले. त्यांना पदवीला ५८.५० टक्के गुण होते. छत्रपती घराण्याने शिष्यवृत्ती दिल्यानेच आपल्याला पुणे येथील शिक्षणाची कवाडे उघडी झाली व त्यातूनच पुढे जगभरातील संधीची कवाडे खुली झाली, अशी त्यांची भावना होती. त्यांनी उत्तम संशोधन केले. शिक्षण क्षेत्रात सर्वोच्चस्थानी असलेल्या युनेस्को या संस्थेशीही ते अनेक वर्षे जोडले होते. डॉ. निगवेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे देशासाठी मैलाचा दगड ठरावा इतके मोलाचे होते. शिक्षण क्षेत्रात पाच दशके विविध बदल घडविणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षणाचा दर्जा आणि संख्यात्मक सुधारणा यावर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

नॅकच्या स्थापनेत योगदान

पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते; परंतु सुरुवातीला ते शिक्षणमंत्री होते. कॅनडाहून त्यांनी जी. राम रेड्डी यांना यूजीसीचे अध्यक्ष म्हणून बोलावले. जेव्हा डॉ. निगवेकर यांनी नॅकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला ते बांधील राहिले. निगवेकर यांनीच नॅकची निर्मिती करण्याचे आव्हान स्वीकारावे, अशी त्यांनी जबरदस्तीच केली. नॅशनल ॲससेमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) हे नावही निगवेकर यांनीच सुचविले आहे.