शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा सदस्य नसल्याने १७ गावांमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:15 IST

(डमी पाठवली आहे. नियोजनातील विषय) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने ...

(डमी पाठवली आहे. नियोजनातील विषय)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे. सरपंच निवडीची सभा मंगळवारी नऊ तारखेला असून, त्या पार्श्वभूमीवर गावागावांत फोडाफोडीचे राजकारण सुुरू आहे. त्यांपैकी काही गावांमध्ये त्या प्रवर्गाचा विजयी उमेदवारच नाही; तर काही गावांमध्ये बहुमत नसलेल्या गटाकडे तो उमेदवार असल्याने बहुमत एका गटाला आणि सरपंच दुसऱ्या गटाचा अशी स्थिती निर्माण होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर म्हणजेच २७ जानेवारीला तालु्क्याच्या ठिकाणी झाले. या आणि पुढील कालावधीत मुदत संपलेल्या अशा १ हजार २५ ग्रामपंचायतींचे हे आरक्षण काढण्यात आले. त्यापैकी निवडणूक झालेल्या १७ गावांमध्ये सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे, अशा गावांची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र सरपंच निवडीच्या सभेनंतरच सर्व गावांमधील चित्र स्पष्ट होऊन त्यावर नंतर निर्णय दिला जाणार आहे.

---

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ४३३, निवडून आलेले सदस्य : ४ हजार २७

---

या गावांमध्ये पेच

गाडेगोंडवाडी, खटांगळे, उपवडे, भामटे कांगणी व चिंचणी (करवीर), बसर्गे, अरळगुंडी, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज), वाठारतर्फ वडगाव, पट्टणकोडोली (हातकणंगले), किणे (आजरा), घोसरवाड, दत्तवाड, जैनापूर, शिरदवाड (शिरोळ), सुळकूड (ता. कागल).

--

काठावरच्या बहुमतात फोडाफोडी

काही गावांमध्ये निवडून आलेल्या दोन गटांमध्ये केवळ एका सदस्याने बहुमताचा फरक आहे. बहुमत मिळालेल्या गटात ५, तर विरोधी गटात ४ सदस्य निवडून आले आहेत. आरक्षण पडलेला उमेदवार विरोधी गटात आहे. अशा काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होत आहे.

--

पुढे काय होणार?

ज्या गावांमध्ये आरक्षित प्र‌वर्गाचा उमेदवार बहुमत असलेल्या किंवा नसलेल्या गटातदेखील नाही, तेथे नव्याने आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण आहे; पण स्त्री उमेदवार नसेल त्या ठिकाणी त्याच आरक्षणाच्या पुरुषाला सरपंचपद मिळू शकते. काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत फोडाफोडीचे राजकारण झाले तर विरोधी गटातील सदस्य सरपंच होऊ शकतो. या सगळ्या घडामोडी मात्र ९ तारखेच्या सरपंच निवडीच्या सभेनंतरच होतील.

---