शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:44 IST

७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत 

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.आज, सकाळपासून शहरात पावसाने उघडीप घेतली. काल, रविवार जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. एकसारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.राधानगरी धरण ८० टक्के भरले असून, स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी पोहोचले आहे. रविवारी दिवसरभरात धरणात तब्बल एक टीएमसी पाणी वाढल्याने रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी धरणाचे एक-दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे यासह पूरबाधित इतर गावांतील नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर स्थलांतर सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

‘राधानगरी’ ८०, तर ‘वारणा’ ७२ टक्क्यांवरधरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत ‘जांबरे’, ‘घटप्रभा’, ‘जंगमहट्टी’, ‘आंबेओहोळ’ ही चार धरणे भरली आहेत. ‘कडवी’ ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्के, तर वारणा ७२ टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर दोन्ही धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामाेरे जावे लागणार आहे.म्हणूनच पुराचे पाण्याला संथगती‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ ही धरणे भरलेली नाहीत. ‘राधानगरी’ व ‘वारणा’तून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे. त्यात अलमट्टीतून विसर्ग प्रतिसेंकद सव्वा लाख घनफूट सुरू असल्याने पुराचे पाणी संथगतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात ‘पंचगंगे’ची पातळी अवघ्या दोन इंचांनी वाढली आहे.

आठवडी बाजारावरही परिणामकोल्हापूर शहरात रविवारी आठवडी बाजार असतो; पण दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बाजारावरही पावसाचा परिणाम जाणवत होता.

  • बंधारे पाण्याखाली : ७८
  • पंचगंगेची पातळी : ३९.२ फूट
  • राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद : ३३
  • पडझड : ८ घरे ( सुमारे ६ लाखांचे नुकसान)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDamधरण