शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 4:02 PM

‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादकसंपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांना दिलेला सबुरीचा सल्ला उत्पादकांबरोबरच नेत्यांच्या भल्याचा असेच म्हणावे लागेल.कोल्हापूरचे राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असले तरी अर्थकारण मात्र दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. पावणेदोन वर्षांनी मिळणा-या उसाच्या पैशातून अल्पभूधारक शेतक-यांच्या जीवनात कधीच स्थैर्य आले नाही. त्यामुळे या शेतक-यांना जगविण्याबरोबरच त्यांचे संसार उभे करण्याचे काम दूध व्यवसायाने, पर्यायाने ‘गोकुळ’ने केले. कोणतीही संस्था राजकारणविरहितराहूच शकत नाही. त्यात ‘गोकुळ’च्या दुधाची चव थोडी न्यारीच असल्याने येथे सत्तेत येणाºयांना हे दूध लवकर मानवते. येथील सत्तेचा वापर करून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते आणि यासाठीच सध्या महाडिक-पाटीलयांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कोणत्याही संस्थेच्या निवडणुकीनंतर विरोधक किमान चार वर्षे तिकडे फिरकत नाहीत. ‘गोकुळ’बाबतही आतापर्यंत तसेच झाले आहे; पण या वेळेला सतेज पाटील यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दुस-या सभेला हजर न राहताच सत्तारूढ गटाच्या अहंपणाने सभा जिंकली. सभा बेकायदेशीरची प्रक्रिया सुरूअसतानाच गाय दूध खरेदी दरातील कपातीचा मुद्दा घेऊन त्यांनी गेले महिनाभर रान उठविले. उत्पादकांच्या दृष्टीने ही भूमिका न्याय्य असल्याने पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत झाले; पण या मागणीच्या आडून त्यांनी राजकीय उट्टे काढण्यास सुरुवात केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था पसरली.महाडिक-पाटील यांच्यातील वाद कशासाठी, हे जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गोकुळ’चे नेतृत्व महाडिक यांच्याबरोबरच पी. एन. पाटील करतात. पण सतेज पाटील यांच्या टीकेचा रोख महाडिक यांच्यावरच राहिल्याने त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही.  राजकीय वैरत्वासाठी वेगळी मैदाने आहेत, त्या ठिकाणी ही भूमिका  कदाचित योग्यही असेल; पण सर्वसामान्य माणसांचा संसारज्या संस्थेवर उभा आहे, तिचा वापर करून एकमेकांचे उट्टे काढण्याचा हा प्रकार म्हणजे ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ असाच म्हणावा लागेल.दोन्ही नेत्यांतील वादावर शांत बसलेल्या पी. एन. पाटील यांनी मोर्चात मनातील खदखद बोलून दाखवीत ‘स्वत:च्या राजकारणासाठी ‘गोकुळ’चा वापर करू नका,’ असा सबुरीचा सल्लाही दिला. या सल्ल्यानंतर महाडिक व पाटील यांना किमान ‘गोकुळ’बाबत तरी संयमाने वागावेच लागेल. पी. एन. पाटील यांचा सबुरीचा सल्ला उत्पादकांसह दोन्ही नेत्यांच्या भल्याचा आहे. दोघांच्या भांडणात सामान्यांच्या अर्थवाहिनीला धक्का लागला तर उत्पादक उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.‘पी. एन.’ यांची सावध भूमिका-पी. एन. पाटील यांची १९९५ पासूनची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकीतील पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळेच झाला आहे. ज्यांच्यासाठी विरोधकांसह स्वपक्षियांना अंगावर घेतले तेही ऐन वेळी आपले रंग दाखवीत असल्याने त्यांनी आता थोडी सावध भूमिका घेणेच पसंत केल्याची चर्चा आहे.संचालकांच्या सवयी बदलणे गरजेचे ‘गोकुळ’चे संचालकपद मानाचे आहेच; त्याबरोबर तेथील बडदास्तीमुळे ते अधिक चर्चेत राहिले. आमदारकी नको; पण संचालकपद द्या, अशी चर्चा होण्यामागे हेच कारण आहे. येथून पाठीमागे दूध उत्पादकांमध्ये जागृती नव्हती, त्यावेळेला कसेही वागले तरी कोणी विचारीत नव्हते. आता बहुतांश दूध उत्पादक हे तरुण व सुशिक्षित असल्याने दहा दिवसांचा हिशेब मांडला जातो. त्यामुळे पूर्वीच्यासवयींमध्ये संचालकांनी बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.