शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

...अन्यथा पुणे-बंगलोर महामार्ग रोखणार : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:11 PM

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी ...

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात आश्वासनांची पूर्तता न केल्यास कृषिपंपधारक आक्रमक होतील

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी दरनिश्चितीसह वीज दरवाढीसंदर्भात शासनाने आश्वासनांपलीकडे ठोस निर्णय घेतलेला नाही. या आश्वासनांची पूर्तता हिवाळी अधिवेशनात केली नाही तर कृषिपंपधारक पुणे-बंगलोर महामार्ग रोखून धरतील, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे पाठविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी शनिवारी प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, कृषिपंपधारकांची पोकळ थकबाकी, वाढीव बिले यासंदर्भात शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने गेल्या मार्चमध्ये कृषिपंपधारकांनी मुंबईत धडक मोर्चा काढला होता.

यावेळी ४१ लाख कृषिपंपधारक वीज ग्राहकांची बिले १५ आॅगस्ट २०१८ पूर्वी तपासून दुरुस्त करण्यात येतील व त्यानंतर अचूक बिलाच्या आधारे नवीन कृषिसंजीवनी योजना राबविण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व पाणीपुरवठा संस्थांची वीज बिले १ रुपया १६ पैसे प्रतियुनिट या दराने २०२० पर्यंत कायम राहतील, असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता वाढीव दराने वीज बिले येत आहेत. बिले न भरल्यास वीजजोडणी तोडण्याच्याही नोटिसाही लागू झाल्या आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गStrikeसंपkolhapurकोल्हापूर