शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
5
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
6
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
7
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
8
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
9
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
10
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
11
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
12
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
13
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
14
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
15
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
16
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
17
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
18
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
19
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
20
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:20 IST

दीडशे संस्था असतील तरच उमेदवारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गेल्या वेळची निवडणूक आणि येणारी निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यावेळी साडेतीन हजार सभासद होते, आता साडेपाच हजार सभासद आहेत. एकूणच ही निवडणूक संस्था सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे महायुती म्हणून व्यवस्थितपणे निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या भूमिकेबद्दल गुरुवारी व्यक्त केले.जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, गोकुळ दूध संघात संचालिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आता गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष आहे. म्हणून या वेळेला त्या सभेत घोषणा देणार नाहीत. फलक घेऊन येणार नाहीत. व्यासपीठावर येतील. मात्र, त्या अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन, असे म्हणाल्या आहेत. मात्र, महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा विनाकारण मतभेद तयार होतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी अध्यक्ष निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यांतील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत. महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात, याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.दीडशे संस्था असतील तरच उमेदवारीमंत्री मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अध्यक्ष निवडीच्या बैठकीवेळी मी असे सांगितले होते की, महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.