शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:20 IST

दीडशे संस्था असतील तरच उमेदवारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गेल्या वेळची निवडणूक आणि येणारी निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यावेळी साडेतीन हजार सभासद होते, आता साडेपाच हजार सभासद आहेत. एकूणच ही निवडणूक संस्था सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे महायुती म्हणून व्यवस्थितपणे निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या भूमिकेबद्दल गुरुवारी व्यक्त केले.जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, गोकुळ दूध संघात संचालिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आता गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष आहे. म्हणून या वेळेला त्या सभेत घोषणा देणार नाहीत. फलक घेऊन येणार नाहीत. व्यासपीठावर येतील. मात्र, त्या अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन, असे म्हणाल्या आहेत. मात्र, महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा विनाकारण मतभेद तयार होतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी अध्यक्ष निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यांतील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत. महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात, याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.दीडशे संस्था असतील तरच उमेदवारीमंत्री मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अध्यक्ष निवडीच्या बैठकीवेळी मी असे सांगितले होते की, महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.