शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला संधी; मात्र, पक्ष विस्ताराचे आव्हान

By विश्वास पाटील | Updated: September 9, 2023 11:56 IST

पक्षाची ही आहे ताकद..

विश्वास पाटीलकोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस काढलेल्या जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचा पारंपरिक जनाधार पुन्हा त्या पक्षाकडे आशेने पाहत असल्याचे चित्र दिसते. परंतु तेवढ्यावर समाधान मानण्यासारखी स्थिती नाही. इचलकरंजी शहरासह कागल, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा तालुक्यात पक्षाची बांधणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांना सांभाळण्यात पक्षांची वाताहत झाल्याचा अनुभव दोन्ही काँग्रेसला आला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची विधान परिषद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि गोकूळ दूध संघात मदत होते म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पक्षाची संघटना वाऱ्यावर सोडल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये नवे नेतृत्व उभे राहू दिले नाही. पक्षाची शाखा स्थापन करायची असते हेच हा पक्ष विसरून गेल्याची स्थिती आहे. आता आमदार सतेज पाटील रस्त्यावर उतरून सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. परंतु त्यांना पक्ष वाढवायचा असेल तर काही ऑपरेशन्स ही करावीच लागतील. पन्हाळ्यात तब्बल २२ वर्षे यशवंत एकनाथ पाटील यांच्यासारख्या जिगरबाज नेत्याने हा मतदारसंघ सांभाळला. तिथे आज पक्षाचे काम कोण करते हेच सांगता येत नाही. त्यांचा मुलगा अमर पाटील हा गोकूळचा संचालक आहे. परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. डॉ. जयंत पाटील यांच्याकडे वारसा, शिक्षण, वय, संस्थात्मक बळ असूनही ते पण आघाडीत रमले आहेत. हीच स्थिती शाहूवाडीत आहे. तिथे कर्णसिंह गायकवाड हे सध्या काँग्रेसचे नेते म्हणून काम करतात. परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. विधानसभेला ते कोणती भूमिका घेणार, हे सांगता येत नाही. शाहूवाडीत दोन्ही गायकवाड मूळ काँग्रेसच्या झेंड्याखाली एक झाले तर सगळ्यांना त्यांच्यामागे धावावे लागेल; परंतु तसे घडत नाही. परंतु तसे न करता नेत्यांच्या मागे राहून पदे मिळवण्यात धन्यता मानल्याने पक्षाची वाताहत झाली आहे.कागलच्या गटातटाच्या राजकारणात नेतृत्वच न मिळाल्याने कागलमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही. एकटे वंदूरचे शिवाजी कांबळे हे तालुकाध्यक्ष सोडले तर तिथे एक कार्यकर्ता पक्षाला उभा करता आलेला नाही. आजरा तालुक्यात ज्यांना काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ते उमेश आपटे सध्या पक्षापासून बाजूला गेले आहेत. हा सुद्धा मुश्रीफ संगतीचाच परिणाम आहे. तिथे नामदेव नार्वेकर यांनी राजीनामा दिल्यापासून तालुकाध्यक्ष नाही. आता अभिषेक शिंपी सक्रिय झाले आहेत. परंतु ते काँग्रेस म्हणून पुढच्या राजकारणात किती एकनिष्ठ राहतात, याचीच उत्सुकता असेल. गडहिंग्लजला विद्याधर गुरबे, किसन व सुरेश कुराडे हे बंधू आणि संग्राम नलवडे हे पक्षासोबत आहेत. गुरबे यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. कुराडे यांची ओळख काँग्रेसचे नेते अशी जरूर आहे. परंतु तालुक्यातील काँग्रेसला त्यांचे कितपत बळ मिळते, हे विचार करण्यासारखे आहे. नलवडे यांचेही तसेच काहीसे आहे.इचलकरंजी शहरातही काँग्रेसला मोठे काम करण्याची गरज आहे. तिथे आतापर्यंत काँग्रेसला पर्यायी शब्द आवाडे असा झाला होता. हा पक्ष खासगी मालकीचा असल्यासारखे झाले. त्यामुळे आवाडे यांनी झेंडा बदलल्यावर काँग्रेस अस्तित्वहीन झाली. आता राहुल खंजिरे, अभ्यासू कार्यकर्ते शशांक बावचकर, संजय कांबळे यांच्यामुळे ती तग धरून आहे. तिला बळ देण्याचे आणि वाढवण्याचे खरे आव्हान आहे.

पक्षाची ही आहे ताकद...करवीर, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ, चंदगडमध्ये काँग्रेस लढण्याच्या तयारीत आहे. तिथे एकतरी भक्कम गट व नेता पक्षासोबत आहे. पक्षाचे आज करवीर, कोल्हापूर शहर, कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदार संघात आमदार आहेत. दहापैकी चार आमदार असलेला तसा हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे. विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. या बळावर लोकसभेसाठी दावा सांगितला आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांनी मनांत आणले तर लोकसभेची जागाही काँग्रेसला अवघड नाही. बहुजन समाजासह दलित, मुस्लीम, इतर अल्पसंख्याक आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडोनंतर तरुणाईमध्येही काँग्रेसबद्दल आकर्षण आहे. या उभारी देणाऱ्या बाबी असून पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आता चांगले वातावरण आहे. जनसंवाद यात्रा त्यासाठी चांगले माध्यम ठरू शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलP. N. Patilपी. एन. पाटील