शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:06 PM

यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मोठा अडथळा दसरा-दिवाळीनंतरच हंगाम वेग घेणार

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.साधारपणे मंत्री समिती १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचा दरवर्षी आग्रह धरते; पण तो प्रत्यक्षात येत नसल्याने यावर्षी तो १५ दिवसांनी पुढे धरण्यात आला आहे. पुणे, नगर, सोलापूर, मराठवाड्यात हा मुहूर्त ठीक आहे; पण कोल्हापूर, सांगली या ऊसपट्ट्यात या मुहूर्ताला कारखान्याची धुराडी पेटूच शकत नाहीत. या काळात परतीचा पाऊस सुरू असतो.

यावर्षी दसरा २५ ऑक्टोबरला आहे, तर दिवाळी १६ नोव्हेंबरला संपते. दसरा झाल्यावरच हंगामाची तयारी सुरू होते. १ नोव्हेंबरपासून मजुरांना आणायचे म्हटले त्यांना आणेपर्यंत दिवाळी सुरू होते. त्यामुळे दसऱ्यानंतर हंगाम सुरू झाला तरी गती घ्यायला दिवाळी संपण्याची वाट तोडणी मजूर पाहतात.उसाचे क्षेत्र वाढलेयंदा अनुकूल हवामानामुळे ऊस पीक जोमदार आले आहे. मुबलक पाण्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर निव्वळ लागण; तर एक लाख हेक्टर हे खोडव्याचे क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० हजार हेक्टरनी उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६० मेट्रिक टन ऊस गाळपास येईल आणि १०० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.हंगाम किमान १३०, तर कमाल १६० दिवसांचायंदा उसाची मुबलक उपलब्धता असल्याने साखर कारखान्यांचा उसाचा दुष्काळ संपणार आहे. हंगाम किमान १३०, तर कमाल १६० ते १८० दिवसही चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी १०० दिवसांचा हंगाम गाठताना कारखान्यांची दमछाक झाली होती. या वर्षी ती कसर भरून निघणार आहे.आंदोलन दरासाठी नव्हे; तर टप्पा टाळण्यासाठीगळीत हंगामाचा सरकारी मुहूर्त निघाला तरी प्रत्यक्ष धुराडी कधी पेटणार हे शेतकरी संघटनेच्याच हातात असते. गेली १७ वर्षे हेच गणित जिल्ह्यात राहिले आहे. एफआरपीच किमान तीन हजार रुपये टनावर दराची उत्सुकता संपली असली तरी ती किती टप्प्यात यावरून मात्र रान पेटणार आहे. दरवर्षी स्वाभिमानी हे रान पेटवत होती; पण यावर्षी स्वाभिमानी सत्तेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे; पण त्यांची जागा घेण्यासाठी विरोधी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनी आतापासून पेरणी सुरू केल्याने आंदोलनाची धग कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरणारा आहे. उसाची मुबलक उपलब्धता ही जमेची बाजू असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एफआरपी भागवण्याइतपत ऐपत तयार करण्यासाठी थकहमीचा आरबीआयकडून तयार झालेला गुंता सरकारने तातडीने सोडवायला हवा. अन्यथा कारखानेच सुरू होऊ शकले नाहीत तर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.- विजय औताडे, माजी कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अभ्यासक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर