शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

जमीन कसते तिसरी पिढी.. सातबारा आजोबांच्या नावे; नोंदणी शुल्क माफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार

By भीमगोंड देसाई | Updated: May 29, 2025 19:16 IST

शेत वाटणीची एक टक्का दस्त नोंदणी शुल्क वाचणार

भिमगोंड देसाईकोल्हापूर : शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. यामुळे दुय्यम निबंधकांकडे वाटणीच्या नोंदणीसाठी मूल्यांकनाचा एक टक्का शेतकऱ्यांचा वाचणार आहे. मात्र यापेक्षा सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया महसूल प्रशासनाकडे यापूर्वीच मोफत आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन निर्णयाचा फायदा केवळ दुय्यम निबंधकांकडे वाटणीपत्र नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. हे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे, असे मुद्रांक प्रशासनाचे म्हणणे आहे.रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहिणी संमतीने शेतजमीन वाटणी करून घेतात. त्याची नोंदणी दुय्यम निबंधकांकडे गेली तर त्या जमिनीच्या रेडीरेकनर मूल्यांकनाच्या एक टक्का रक्कम किंवा अधिकाधिक ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावी लागत होती. आता शासनाने नोंदणी शुल्क माफ केल्याने ही रक्कम भरावी लागणार नाही.पण यापेक्षा शेतकरी पूर्वीपासूनच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदार यांच्यासमोर मोफत वाटणीपत्राची तरतूद आहे. ही प्रक्रिया दुय्यम निबंधकांपेक्षा सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे सर्व भाऊ, बहीण यांची संमती असेल तर तहसीलदार यांच्यासमोरच वाटणीपत्र करून घेतो. वाद असल्यास न्यायालयात वाटणीपत्र दाखल होते. तेथे लागलेल्या निकालपत्रानुसार किंवा तडजोड नामानुसार मालमत्तेची वाटणी होते.

शेतकऱ्यांसाठी निर्णय चांगला मात्र लाभ कमीभाऊ, बहिणीमध्ये संमतीने वाटणीपत्र करून त्याची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करणाऱ्यांसाठी नवीन निर्णय चांगला आहे. पण अशा पद्धतीने नोंदणी करण्याकडे कल कमी असल्याने याचा लाभ कमी शेतकऱ्यांना होणार आहे, असे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.

दलालांमधून सुटका कधी ?दुय्यम निबंधकांकडील शुल्क माफ झाले आहे. पण येथे नोंदणीसाठी सक्रिय असलेल्या दलालांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची कधी सुटका होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीGovernmentसरकार