शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ना ‘कार्यक्रम’... ना ‘अल्टीमेट’! ‘गडहिंग्लज’ची पाणी परिषद : ठोस भूमिकेअभावी झाला उद्बोधकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:13 IST

गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी

राम मगदूम ।गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी पाणी मिळावे, ही प्रमुख मागणी घेऊन गडहिंग्लजची पाणी परिषद भरली. मात्र, त्यातील सहभागी नेत्यांची भाषणे आणि मंजूर ठराव पाहता परिषदेत पाण्यासंदर्भात केवळ चर्चाच झाली. त्यातून ‘ना’ जनतेला कार्यक्रम मिळाला, ‘ना’ सरकारला अल्टीमेट. त्यामुळेच ठोस भूमिकेअभावी ही परिषद म्हणजे उद्बोधकांचा मेळाच ठरला.

१९९० च्या दशकात तत्कालीन लोकप्रतिनिधी व जनतेच्या उठावामुळे त्यावेळी रखडलेले ‘चित्री’ व ‘फाटकवाडी’ हे दोन प्रकल्प मार्गी लागले. मात्र, त्यानंतर मंजूर झालेले वरील तिन्ही प्रकल्प वेळेवर निधी व पुनर्वसनअभावी आजही रेंगाळलेलेच आहेत. घळभरणीच्या कामापर्यंत येऊन थांबलेले हे प्रकल्प कधी पूर्ण होणार? याचा जाब विचारावा आणि गडहिंग्लजच्या पूर्वेकडील जनतेलाही पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, हाच या परिषदेचा मुख्य हेतू होता. जनतेच्या मनातील ही मागणी केदारी रेडेकर फौंडेशनने उचलून धरली आणि त्यासाठी सर्वांना एका व्यासपीठावर आणले. त्याबद्दल फौंडेशनचे कौतुक आहेच; परंतु परिषदेच्या सफलतेविषयीदेखील साधक-बाधक चर्चा करायला हवी तरच दीर्घकाळानंतर नव्याने सुरू झालेल्या पाण्याच्या चळवळीला मूर्त स्वरूप येऊन संयोजकांचे कष्ट कारणी लागतील.

कोल्हापुरातील लिंगायत मोर्चा व गडहिंग्लजच्या पाणी परिषदेचा दिवस आणि वेळ एकच असल्यामुळे सहभागी झालेल्या नेत्यांना पाणी परिषदेसाठी पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळेच घाई-गडबडीत येऊन हजेरी लावणे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत इतकेच सांगणे किंवा हे सरकार पक्षाचे काम आहे, त्यांनी ते पार पाडले पाहिजेत, अशी शेरेबाजी करणे. यापलीकडे काही घडल्याचे एकंदरीत कार्यक्रमावरून दिसले नाही. तथापि, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन त्यांना काही कालबद्ध कृती कार्यक्रम देणे शक्य होते. तसेच अपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकारला ‘अल्टीमेट’ही द्यायला हवा होता. मात्र, तेही घडले नाही. त्यामुळेच ही परिषद म्हणजे केवळ ‘इव्हेंट’ ठरल्याची चर्चा जनमानसात आहे.‘समन्यायी’ पाण्याचे काय ?सार्वजनिक पैशांतून बांधण्यात येणाºया धरणातील ‘पाणी’ या संसाधनावर लाभक्षेत्रातील तमाम जनतेचा हक्क आहे. मात्र, जंगमहट्टी, फाटकवाडी, चित्री आणि झांबरे-उमगाव या प्रकल्पांचे उदाहरण लक्षात घेता हे संसाधन मूठभरांच्या ताब्यात जाऊन जुन्या सावकारीप्रमाणे ‘नवी पाणीदारी’ सुरू झाली आहे. यासंदर्भातही ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, या विषयाला स्पर्शदेखील झाला नाही. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील बहुसंख्य अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या शेतीला हक्काचे पाणी कसे मिळणार ? हा कळीचा मुद्दा बाजूलाच राहिला.‘पाणीदार’ गावांसाठी ‘चळवळ’!दर दोन-चार वर्षांनी पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी येणाºया गडहिंंग्लजच्या पूर्वेकडील खेड्यांच्या समृद्धीसाठी पाणी फौंडेशनच्या धर्तीवर लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविणे शक्य आहे. संयोजकांनी त्यासंदर्भात वेळोवेळी बोलूनही दाखविले. मात्र, त्यासाठीदेखील काही कृती कार्यक्रम देणे त्यांच्याकडून राहून गेले, तर दस्तुरखुद्द महसूल व पुनर्वसनमंत्री येऊन देखील ठोस आश्वासनांअभावी नेत्यांचे रुसवे-फुगवे व टीका-टिप्पणीचीच चर्चा अधिक झाली.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूर