शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये ‘भूखंड’ विकसित करताना सुविधांकडे दुर्लक्ष- कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:42 IST

जहाँगीर शेख । कागल : कागल शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे भूखंड विकसित करून विक्री करण्याचा व्यवसायही तेजीत आहे. गुंठेवारी प्रकल्पापासून ...

ठळक मुद्देग्राहकांबरोबरच नगरपालिकेलाही लावला जातोय चुना

जहाँगीर शेख ।कागल : कागल शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे भूखंड विकसित करून विक्री करण्याचा व्यवसायही तेजीत आहे. गुंठेवारी प्रकल्पापासून ग्रीन झोनमधील रहिवाशी क्षेत्रे निर्माण करताना अनेकांनी आपला अर्थिक विस्तार करून घेतला आहे. एकीकडे रहिवासी प्लॉट विक्री करून त्याद्वारे काहीं मंडळींनी भरमसाट अर्थिक लाभ मिळविले असताना नगरपालिकेवर मात्र रस्ते, गटर्स, पाण्यासारख्या सुविधांचा अर्थिक भुर्दंड टाकला जात आहे.भूखंड विकसित करणारे मूलभूत सुविधांच्या बाबतीत ग्राहकांना आणि नगरपालिकेलाही चुना लावीत आहेत. पालिका प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कागल शहर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाले आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि येथे मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, चागंले हवामान, पाणी, महामार्गावरील शहर अशा काही कारणांनी कागलमध्ये येऊन राहणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. यातून भूखंड विकसित करून विक्री करण्याचा व्यवसायही तेजीत आला; पण काहीनी कायदे, नियम धाब्यावर बसवून असे भूखंड विकसित करून विक्री करूनही मोकळे झाले आहेत. नगरपालिकेच्या यंत्रणाचा यामध्ये मोठा वाटा राहिला आहे. यातून अनेक उपनगरे जन्माला आली आहेत. पण, तेथे मूलभूत सुविधांची वाणवा आहे.

वास्तविक, असे भूखंड विकसित करणाऱ्यांनी तेथील रस्ते, गटर्स, वीज आणि पाणीपुरवठा या सुविधा ग्राहकांना देण्याबद्दल आॅफिडेट करून लिहून दिलेले असते; पण एकदा अंतिम परवाने मिळाले की, फुकट मिळालेले आणि चोरून आणलेले दगड, मुरूम टाकून रस्ते, कच्च्या गटारी, आणि चार-दोन पोल उभे करून कसेबसे भूखंड विकून मोकळे होतात आणि पुन्हा दुसºया जागेकडे मोर्चा वळवितात. मग, येथे बंगले बांधकाम करणारे लोक नगरपालिकेकडे पक्के रस्ते, गटर्स करून द्या म्हणून मागे लागतात. राजकीय गरजेतून मग ही कामे केली जातात. यातून नगरपालिकेचा लाखो रुपयांचा फंड कारण नसताना खर्च होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.ग्राहकांना मनस्तापप्लॉट विक्री लवकर व्हावी म्हणून अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात. त्यापैकी वीज उपल्ब्ध करून देण्याचे काम होय. एकीकडे शेतकरी किंवा घरगुती ग्राहक वीज कनेक्शनसाठी अर्ज करतो तेव्हा पोल उपल्ब्ध नाहीत म्हणून त्यांना वर्ष, वर्ष ताटकळत ठेवले जाते. मात्र, असे प्लॉट पडले की, बघता-बघता विजेचे पोल उभे राहतात. ग्राहकही आकर्षित होतात; पण नंतर प्रत्यक्ष वीज कनेक्शन देताना हात वर केले जातात.नगरपालिका यंत्रणेवर ताणअशा अनेक वसाहती फोफावत असताना पालिका यंत्रणा मात्र बेफिकीर बनून राहिली आहे. खरे तर या ठिकाणी मूलभूत सुविधा का दिल्या नाहीत? याबद्दल जाब विचारून कारवाई करायच्याऐवजी येथे त्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. येथील अर्थिक व्यवहारांची चर्चा आता जाहीर सभेतही होऊ लागली आहे. परिणामी, पालिकेच्या इतर यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलन