शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

वेगाची नशा, आयुष्याची दशा, तरुणाईच्या वेगावर सामूहिक नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:53 IST

शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.

ठळक मुद्देवेगाची नशा, आयुष्याची दशातरुणाईच्या वेगावर सामूहिक नियंत्रणाची गरज

कोल्हापूर : शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.विविध कंपन्यांनी तरुणाईला आकर्षित करून घेण्यासाठी काढलेली स्पोर्टस मॉडेल, आपल्याकडील रस्त्यांची असलेली परिस्थिती, वाहतुकीचे नियम तोडण्याकडेच असलेला युवक-युवतींचा कल यातूनच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असून अपघात होणारच असे म्हणून न थांबता या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचीच गरज निर्माण झाली आहे.वास्तविक दहावीनंतर मुलामुलींना दुचाकी गाड्यांची अधिकच गरज असताना आपल्याकडे मात्र ज्या सीसी गाड्यांसाठी परवाना देणे शक्य आहे, अशा सीसीच्या गाड्याच बाजारात उपलब्ध नाहीत, हे वेगळेच वास्तव आहे. दुसरीकडे, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय घरांतील मुलांमध्ये स्पोर्टस बाईक्सची मोठी क्रेझ असून, यासाठी त्यांची पालकांकडे सातत्याने मागणी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.अशा प्रकारची गाडी जर आपल्याला घेऊन दिली नाही तर मग मित्रांच्या गाड्या चालविण्याचे प्रकार घडतात. गुरुवार (दि. ७)चा अपघात झाला तेव्हाही ठार झालेला मंदार पाटील हा मित्राचीच गाडी चालवीत होता. एरवी साध्या दुचाकी गाड्याही युवक भरधाव वेगाने चालवत असल्याचे सर्रास चित्र कोल्हापूर शहरामध्ये दिसून येत आहे.डाव्या बाजूने गाडी पुढे नेणे, इंडिकेटर्सचा वापर न करणे, पुढच्या वाहनांनी काय इंडिकेटर्स दिले आहेत याची दखल न घेणे, गाडी रेस करीत पळविणे असे सर्रास प्रकार तरुणांकडून सुरू असतात. अनेकदा रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या नागरिकांनाही या युवकांच्या भरधाव वेगाचा त्रास होत असतो. शेजारून ज्या पद्धतीने हे युवक गाडी घेऊन घासून जातात, ते पाहून जीव घाबरतो.याला युवतीदेखील अपवाद नाहीत. तोडांला स्कार्फ घट्ट बांधल्याने अनेक मुलींना पाठीमागून वाजविले जाणारे हॉर्न ऐकू जात नाहीत. मुलीही सर्रास ट्रिपलसीट बसून जातात. या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांनीही त्यांची नेहमी सुरू असणारी कारवाई आणखी कडक करण्याची गरज आहे.दीड वर्ष मागूनही गाडी दिली नव्हतीगुरुवारी झालेल्या अपघातात ठार झालेल्या मंदार पाटील यांच्या घरी शुक्रवारी भेट दिली असता केवळ सुन्नपणा अनुभवण्यास आला. ‘गेले दीड वर्ष मंदार स्पोर्टस बाईक मागत होता. परंतु या गाड्या भन्नाट पळतात; परंतु नियंत्रित होत नाहीत, याची मला माहिती असल्याने मी त्याला गाडी घेऊन दिली नव्हती. आता मित्राची गाडी चालविताना अपघात झाला आणि त्यात तो गेला. आता आईवडील म्हणून आम्ही काय करायचं?’ असा प्रश्न मंदारचे वडील मधुसूदन पाटील यांनी विचारला, ज्याला काहीच उत्तर नव्हते. मंदार याचा मोठा भाऊ जहाजावर असून १० दिवसांनंतर तो कोल्हापूरला येणार आहे.दिसेल तिथे चापण्याची गरजवेगवान तरुणाईला दिसेल तेथे चापण्याची कामगिरी आता केवळ पोलिसांनाच करून चालणार नाही. नागरिकांनीही अशा युवकांना किमान त्याच ठिकाणी सौम्य शब्दांत का असेना, काही सांगण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांसह घरातूनही याबाबत सातत्याने प्रबोधन करीत राहणे हाच यावरचा उपाय आहे. 

 

टॅग्स :bikeबाईकAccidentअपघातStudentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर