शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वेगाची नशा, आयुष्याची दशा, तरुणाईच्या वेगावर सामूहिक नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:53 IST

शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.

ठळक मुद्देवेगाची नशा, आयुष्याची दशातरुणाईच्या वेगावर सामूहिक नियंत्रणाची गरज

कोल्हापूर : शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.विविध कंपन्यांनी तरुणाईला आकर्षित करून घेण्यासाठी काढलेली स्पोर्टस मॉडेल, आपल्याकडील रस्त्यांची असलेली परिस्थिती, वाहतुकीचे नियम तोडण्याकडेच असलेला युवक-युवतींचा कल यातूनच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असून अपघात होणारच असे म्हणून न थांबता या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचीच गरज निर्माण झाली आहे.वास्तविक दहावीनंतर मुलामुलींना दुचाकी गाड्यांची अधिकच गरज असताना आपल्याकडे मात्र ज्या सीसी गाड्यांसाठी परवाना देणे शक्य आहे, अशा सीसीच्या गाड्याच बाजारात उपलब्ध नाहीत, हे वेगळेच वास्तव आहे. दुसरीकडे, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय घरांतील मुलांमध्ये स्पोर्टस बाईक्सची मोठी क्रेझ असून, यासाठी त्यांची पालकांकडे सातत्याने मागणी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.अशा प्रकारची गाडी जर आपल्याला घेऊन दिली नाही तर मग मित्रांच्या गाड्या चालविण्याचे प्रकार घडतात. गुरुवार (दि. ७)चा अपघात झाला तेव्हाही ठार झालेला मंदार पाटील हा मित्राचीच गाडी चालवीत होता. एरवी साध्या दुचाकी गाड्याही युवक भरधाव वेगाने चालवत असल्याचे सर्रास चित्र कोल्हापूर शहरामध्ये दिसून येत आहे.डाव्या बाजूने गाडी पुढे नेणे, इंडिकेटर्सचा वापर न करणे, पुढच्या वाहनांनी काय इंडिकेटर्स दिले आहेत याची दखल न घेणे, गाडी रेस करीत पळविणे असे सर्रास प्रकार तरुणांकडून सुरू असतात. अनेकदा रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या नागरिकांनाही या युवकांच्या भरधाव वेगाचा त्रास होत असतो. शेजारून ज्या पद्धतीने हे युवक गाडी घेऊन घासून जातात, ते पाहून जीव घाबरतो.याला युवतीदेखील अपवाद नाहीत. तोडांला स्कार्फ घट्ट बांधल्याने अनेक मुलींना पाठीमागून वाजविले जाणारे हॉर्न ऐकू जात नाहीत. मुलीही सर्रास ट्रिपलसीट बसून जातात. या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांनीही त्यांची नेहमी सुरू असणारी कारवाई आणखी कडक करण्याची गरज आहे.दीड वर्ष मागूनही गाडी दिली नव्हतीगुरुवारी झालेल्या अपघातात ठार झालेल्या मंदार पाटील यांच्या घरी शुक्रवारी भेट दिली असता केवळ सुन्नपणा अनुभवण्यास आला. ‘गेले दीड वर्ष मंदार स्पोर्टस बाईक मागत होता. परंतु या गाड्या भन्नाट पळतात; परंतु नियंत्रित होत नाहीत, याची मला माहिती असल्याने मी त्याला गाडी घेऊन दिली नव्हती. आता मित्राची गाडी चालविताना अपघात झाला आणि त्यात तो गेला. आता आईवडील म्हणून आम्ही काय करायचं?’ असा प्रश्न मंदारचे वडील मधुसूदन पाटील यांनी विचारला, ज्याला काहीच उत्तर नव्हते. मंदार याचा मोठा भाऊ जहाजावर असून १० दिवसांनंतर तो कोल्हापूरला येणार आहे.दिसेल तिथे चापण्याची गरजवेगवान तरुणाईला दिसेल तेथे चापण्याची कामगिरी आता केवळ पोलिसांनाच करून चालणार नाही. नागरिकांनीही अशा युवकांना किमान त्याच ठिकाणी सौम्य शब्दांत का असेना, काही सांगण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांसह घरातूनही याबाबत सातत्याने प्रबोधन करीत राहणे हाच यावरचा उपाय आहे. 

 

टॅग्स :bikeबाईकAccidentअपघातStudentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर