शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागाचे आधुनिकीकरण गरजेचे, इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा मेळावा : नरेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:51 IST

साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

इचलकरंजी : साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहिजे. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी दिली.

येथील घोरपडे नाट्यगृहात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने आयोजित यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात तेबोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेशकुमार म्हणाले, बदलत्या काळानुसार व्यवसायात आवश्यक बदल करून घेणे हे बाजारात टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी त्याचे आधुनिक रॅपियर यंत्रमागातरूपांतर करावे. त्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ३५ टक्के व स्वभांडवल १५ टक्के अशीयोजना आहे. त्याचबरोबर सूताच्या कृत्रिम दरवाढीला पर्याय म्हणून किमान ११ यंत्रमागधारकांनी एकत्रित येऊन यार्न बॅँक सुरू करावी. त्यांच्याकडून जेवढे भांडवल एकत्रित होईल, तेवढेच भांडवल केंद्र सरकार देणार आहे. याचा सूत खरेदीसाठी उपयोग करावा. कारखानदारांनी एकत्रित येऊन ग्रुपशेड पद्धतीने व्यवसाय करावा. त्यासाठीही योजना आहेत.

वीज बचत करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन कारखान्यावर सोलर पॅनेल बसवावे. कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेचाही लाभ घ्यावा. अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

आमदार हाळवणकर यांनी, उद्योगधंद्यात राजकारण आणणाऱ्यांच्या नादाला यंत्रमागधारकांनी लागू नये. आपल्या धंद्यावर लक्ष केंद्रित करावे. सरकारने पाच टक्के व्याजात सवलत जाहीर केली आहे. आगामी अधिवेशनात वीज दराबाबतही सवलत जाहीर करेल. यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण केल्यास उत्पादन वाढणार आहे. तसेच आवाज कमी, दुरुस्ती खर्च कमी, गती जास्त त्यामुळे उत्पादन वाढून उत्पन्न व पर्यायाने नफा वाढणार आहे. त्यासाठी ६५ पार्ट बदलून साध्या यंत्रमागाचे आधुनिक मागात रूपांतर होते, ते करण्याचा संकल्प यंत्रमागधारकांनी करावा. त्यातून नक्कीच व्यवसायाला गती मिळेल, असे आवाहन केले.

मेळाव्यात नरेंद्र वन्नम, पी. ए. कुलकर्णी, सुरेश इंगळे, किसन पवार, अशोक स्वामी, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, आदींसह प्रमुख पदाधिकारी, तसेच यंत्रमागधारक उपस्थित होते.पथदर्शी प्रकल्पकेंद्र व राज्य शासनामार्फत साध्या यंत्रमागाचे आधुनिक यंत्रमागात रूपांतर करण्यासाठी सुरू केलेली ही योजना इचलकरंजी, सोलापूर, भिवंडी, नागपूर या चार शहरांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासनाने सुरू केली आहे.

इचलकरंजीत यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, सुरेश हाळवणकर, अलका स्वामी, अशोक स्वामी, नरेंद्र वन्नम, आदी उपस्थित होते.