शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

मेरी वेदर गैरव्यवस्थेच्या विळख्यात, प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:39 IST

काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या या मैदानामध्ये खेळणे, तसेच मॉर्निंग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.

ठळक मुद्देमेरी वेदर गैरव्यवस्थेच्या विळख्यात, प्रशासनाची अनास्थामद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा

कोल्हापूर : काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या या मैदानामध्ये खेळणे, तसेच मॉर्निंग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.मेरी मैदानावर १२ महिनेही चार ते पाच क्रिकेट व फुटबॉलचे क्लब नियमित सरावासाठी येतात. आता तर शाळा-कॉलेजांना सुट्टी पडत असल्याने मोठ्या संख्येने खेळाडू येतात. या ठिकाणी मेरी वेदर क्लब, एन. सी. सी. क्लब, संडे-मंडे क्रिकेट क्लब, ओल्ड स्टार क्रिकेट क्लब यांसह १२ महिने फक्त फुटबॉल खेळणारेही काही ग्रुप आहेत. फक्त खेळायला न येता, महानगरपालिकेकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, सामाजिक बांधीलकी जपत या क्लबनी या मैदानात विविध उपक्रम राबविल्यामुळे मैदानाचा चेहरा थोडा बदलला आहे.येथे नियमित खेळायला येणाऱ्या क्लबने मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा चेंडू चुकून वॉकिंगसाठी आलेल्या पादचाऱ्यांपैकी कोणाला लागू नये; यासाठी मैदानात एका बाजूला स्वखर्चाने लोखंडी जाळी उभी केली आहे; त्यामुळे खेळाडूंना मुक्तपणे खेळता येते. तसेच सिमेंटचे पीचही केले आहे.

खरे तर या मैदानावर हिरवळ उगविण्याची आवश्यकता आहे; परंतु मैदानाची देखभाल करण्यासाठी येथे कोणीही उपलब्ध नसल्याने तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तरी क्लबच्या वतीने मैदानासभोवती विविध प्रकारची १00 झाडे लावून ती जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र मैदानाच्या वारणा कॉलनीच्या बाजूला असलेला कोंडाळा दर १५ दिवसांनी पेटविला जात असल्याने तिथे सुमारे १० ते १५ फूट उंच वाढलेल्या झाडांना त्याची झळ बसत असल्यामुळे झाडे कोमेजतात. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे.या ठिकाणी ओपन जिम बसविल्याने त्याचा फायदा अनेकांना होत आहे. तसेच ई-टॉयलेटची सोय करण्यात आली आहे; त्यामुळेही आबालवृद्धांची मोठी सोय झाली आहे. यासह येथे बॅडमिंटन कोर्ट असल्याने त्याचा अनेकांना फायदा होत आहे.

जॉगिंग ट्रॅकची दुरवस्थापहाटे पाच वाजल्यापासूनच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानात जॉगिंग ट्रॅकवरून चालणे, धावणे सुरू असते, तसेच कोठे योगसाधना, प्राणायाम करणारे नागरिकही आढळतात; मात्र ट्रॅकची दुरवस्था झाली असून, मैदानाची माती कधी-कधी या ट्रॅकवर येते. तसेच बॅडमिंटन कोर्टपासून ट्रॅक अर्धवट सोडल्याने मैदानातील खड्ड्यांतून त्यांना पुढे जावे लागते.

अनैतिक कृत्यांना आळा घालावामैदानाच्या परिसरात असलेले विजेचे खांब अनेकदा नादुरुस्त होतात. रात्री येथे अंधाराचे साम्राज्य असते. रात्रीच्या वेळी मद्यपी या मैदानाचा ताबा घेतात. मद्य पिऊन ते येथेच बाटल्या फेकतात. तळीरामांच्या या उपद्व्यापामुळे समस्येत आणखीनच भर पडते. मद्याच्या बाटल्या सर्रास मैदानात फेकून दिल्याने मुलांनाच, ज्येष्ठांनाच मैदानाची स्वच्छता करावी लागते. त्यातच हे मैदान आता प्रेमीयुगुलांचा लव्ह पॉइंटच होऊ लागले आहे. अशा अनैतिक कृत्यांना आळा घालण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.

 

मैदानात या परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी नियमित कॉलेज चुकवून येथे दंगा करीत बसलेले असतात. त्यांचे टोळकेच बनत चालले आहे. येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. यासह मैदानात लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी महानगरपालिकेने सोय करावी.- मिलिंद देसाई

 

विजेची सोय नसल्याने मैदानाचा ओपन बार म्हणून वापर केला जात आहे. सकाळी यामुळे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो; यासाठी लाईटची सोय करून स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी नियुक्ती करावी.- उद्योजक,रोटेरियन संजय कदम 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर