शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लोकसभेनंतरच; सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 14:29 IST

सध्या भाजपला आगामी लोकसभा महत्वाची

कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीनंतरच होतील असे एकूण वातावरण दिसत आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबरला याबाबत जरी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असली तरी निकाल लागण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इच्छुकांची कोंडी होताना दिसत आहे.कोल्हापूर महापालिकेवर १५ नोव्हेंबर २०२० रोजी तर जिल्हा परिषदेवर २१ मार्च २०२२ पासून प्रशासक आहे. महापालिकेवर तब्बल तीन वर्षे तर जिल्हा परिषदेवर दीड वर्ष प्रशासक आहे. परंतु या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका एकत्र करून त्या चालवण्यात येत असल्याने अजूनही याबाबत निर्णय होत नाही ही वस्तुस्थिती आहे.इतर मागास आरक्षण, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची महाविकास आघाडीने संख्या वाढवली होती. त्यानुसार प्रभाग रचनाही झाली होती. परंतु महायुतीचे सरकार आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. इतर मागास आरक्षण, प्रभाग रचना आणि वाढीव सदस्य संख्या अशा तीन मुद्यांवरून राज्यातील अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या. गेले वर्षभर यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे.दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर आले. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने व्हाव्यात यासाठी सरकारही फारसे आग्रही नसल्याचे दिसते. निवडणुकांमध्ये किती बळ मिळेल आणि त्याचा लोकसभेवर किती परिणाम होईल, याचा अंदाज नसल्याने या निवडणुका पुढे कशा जातील याचीच काळजी घेतली जात आहे. सध्या भाजपला येणारी लोकसभा महत्वाची आहे. त्यांना महाराष्ट्रातून ४२ जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे या अंदाजावर विपरित परिणाम होणारी कोणतीही निवडणूक आधी होऊ नये यासाठीच प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभेला यश मिळवून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसायचे भाजपचे नियोजन आहे. त्यानंतर अन्य महापालिका आणि मग त्याच्या जोरावर पुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या असे नियोजन असल्याचे याच पक्षाचे नेते खासगीत बोलत आहेत. मे महिना जर लोकसभा निवडणुकीतच गेला तर मात्र ज्यांच्या मुदती संपल्या आहेत त्या वेळापत्रकानुसार या निवडणुका पावसाळ्यानंतरही होऊ शकतात.

इच्छुकांच्या पोटात गोळामहापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी गेल्या तीन वर्षात गणेशोत्सवापासून अन्य बाबतीत मंडळांना खूष ठेवण्यासाठी हात सैल सोडला आहे. त्याआधीही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यातही या सर्वांनी पुढाकार घेतला होता. परंतु निवडणुकाच लागत नसल्याने अनेकांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय