शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

महानगरपालिका निवडणूक कडक निर्बंधांच्या कचाट्यात, काय आहेत निर्बंध? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 1:25 PM

उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून निर्बंधांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कारवाईसुध्दा होणार आहे.महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची तयारी पालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. पालिका प्रशासनाने प्रभागांचे प्रारूप आराखडे तयार करून आयोगास सादर केले आहेत. आता आयोगाकडून प्रारूप आराखडे जाहीर केले जाण्याची प्रतीक्षा आहे.एकीकडे प्रारूप आराखडे, आरक्षण प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची यावर ठोस निर्णय होत असताना त्याही पुढे जाऊन आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणते नियम पाळायचे आहेत, कशाप्रकारे पाळायचे आहेत याचे सविस्तर पत्र महानगरपालिकेला पाठविले आहे.सर्वसाधारण नियम असे - निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्ती, कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे. 

- मतदान कक्षात काम करणाऱ्या सर्वांना दोन डोस घेणे आवश्यक. दोन डोस झाले नसतील तर ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक. 

- मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्यांचे तापमान तपासणार. मतदान केंद्रात सामाजिक अंतर राखणे आवश्यक. 

- शक्यतो मोठ्या हॉलमध्ये केंद्र सुरू करावीत. मतदान यंत्र हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोज आवश्यक.

नामनिर्देशन प्रक्रियाउमेदवारी अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यानंतर त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत. यावेळी दोन व्यक्तींनाच प्रवेश देणार. बहुसदस्य प्रभाग असल्यास एका केंद्रावर मतदार संख्या ७०० ते ८०० असणार, एक सदस्य प्रभाग असल्याच एक हजार मतदार संख्या असणार.मतदारांचा थर्मल स्कॅनिंग होणार. मास्क नसल्यास केंद्रातून देण्याची सोय. पॉझिटिव्ह रुग्णांना शेवटच्या एक तासात मतदानाची परवानगी. मतमोजणी केंद्रातही हीच नियमावली असेल.प्रचार कसा करायचा? -राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार कसा करावा याचेही नियम केले आहेत. पहाटे पाच ते रात्री ११ जमावबंदी असल्याने पाच लोकांना येण्यास प्रतिबंध असेल.मोठ्या जागेत ५० लाेकांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी परवानगी आवश्यक. पदयात्रा, घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा कमी लोकांना परवानगी. मतमोजणीनंतर मिरवणूक काढण्यास बंदी असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक