शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 5:59 PM

खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देमुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटकातांत्रिक अडचणीमुळे कंपनीचा निर्णय; तिकिटाचे पैसे परत

कोल्हापूर : खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.ट्रूजेट कंपनीचे विमान अहमदाबादहून जळगावला येते. तेथून मुंबई आणि मुंबईमधून हे विमान कोल्हापूरला येते. मात्र, खराब हवामानामुळे अहमदाबाद आणि जळगावहून मुंबईला विमान उशिरा आले. त्यामुळे मुंबईहून विमान निघाल्यास ते सायंकाळी साडेपाचनंतर पोहोचणार होते.

इतक्या वेळाने विमान पोहोचल्यास कोल्हापुरातून अंधारातून उड्डाण करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे कंपनीने कोल्हापूर फेरी रद्द केली. त्याचा फटका मुंबईहून येणाऱ्या ३८ आणि कोल्हापूरमधून जाणाऱ्या ४७ प्रवाशांना बसला. ज्या प्रवाशांना दुसऱ्या दिवशीच्या विमानाने जायचे होते, त्यांना त्या दृष्टीने तिकीट देण्यात आले. ज्यांना तिकिटाचे पैसे हवे होते, त्यांना ते देण्यात आले.

दरम्यान, मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर नियमितपणे सेवा पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी मात्र, खराब हवामानामुळे विमान एक तास उशिरा कोल्हापुरात आले होते.

खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून कोल्हापूरला येणारे विमान रद्द करण्यात आले. ज्या प्रवाशांनी तिकिटाचे पैसे अथवा दुसऱ्या दिवसाचे तिकीट मागितले, त्यांना ते देण्यात आले.- रणजितकुमार, कोल्हापूरचे व्यवस्थापक, ट्रूजेट कंपनी 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर