शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

बहुसदस्यीय प्रभाग रचना संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी - असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:03 IST

महाराष्ट्रातच का स्वीकारली जातेय बहुसदस्यीय प्रभाग रचना?

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना ही मतदार, उमेदवार तसेच लहान लहान पक्षांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी असल्याने ती रद्द केली जावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.सत्ताधारी पक्ष आपले हित डोळ्यांसमोर ठेवून जर कायद्याचा गैरवापर करत असतील तर ते चुकीचे असून, मतदारांनी अशी चार बहुसदस्यीय प्रभाग रचना नाकारली पाहिजे, आपला विरोध दर्शविला पाहिजे, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.प्रभाग रचना कशी करावी, याचे अधिकार राज्य सरकारला असले तरी सत्तेवर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सोयीची भूमिका घेत प्रभाग रचना केली आहे. त्यामुळे याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. भारतात अन्य कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात नसताना ती महाराष्ट्रातच का स्वीकारली जातेय, असा सवाल त्यांनी केला.७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्या त्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी एकत्रित सहभाग देऊन विकास कामे केली जातील, त्यामध्ये इतरांचा हस्तक्षेप राहणार नाही; परंतु आता बहुसदस्यीय पद्धतीमुळे ते अशक्य आहे. चार सदस्य एखाद्या प्रभागातून निवडून आले तर जबाबदार कोणाला धरायचे, हा प्रश्न मतदारांना पडणार आहे, असे सरोदे म्हणाले.सामान्य कार्यकर्ता, लहान लहान पक्ष यांना संपविण्याचे काम बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे होणार आहे. यातून पारदर्शकता नष्ट होणार आहे. कायद्याचा केलेले गैरवापर हा अतिशय चुकीचा आहे. म्हणूनच मतदारांनीच आता पुढे आले पाहिजे. बहुसदस्यीय प्रभाग रचना आम्हाला नको आहे म्हणून मतदारांनीच सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार उपस्थित होते.४७ टक्के मतदारांचा विराेधपुण्यातील एका संस्थेने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग पद्धतीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ४७ टक्के मतदारांनी बहुसदस्य प्रभाग रचना करणे चुकीचे असल्याचे म्हटले असल्याचे सरोदे यांनी सांगितले.