शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यीय प्रभाग रचना संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी - असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:03 IST

महाराष्ट्रातच का स्वीकारली जातेय बहुसदस्यीय प्रभाग रचना?

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना ही मतदार, उमेदवार तसेच लहान लहान पक्षांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी असल्याने ती रद्द केली जावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.सत्ताधारी पक्ष आपले हित डोळ्यांसमोर ठेवून जर कायद्याचा गैरवापर करत असतील तर ते चुकीचे असून, मतदारांनी अशी चार बहुसदस्यीय प्रभाग रचना नाकारली पाहिजे, आपला विरोध दर्शविला पाहिजे, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.प्रभाग रचना कशी करावी, याचे अधिकार राज्य सरकारला असले तरी सत्तेवर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सोयीची भूमिका घेत प्रभाग रचना केली आहे. त्यामुळे याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. भारतात अन्य कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात नसताना ती महाराष्ट्रातच का स्वीकारली जातेय, असा सवाल त्यांनी केला.७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्या त्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी एकत्रित सहभाग देऊन विकास कामे केली जातील, त्यामध्ये इतरांचा हस्तक्षेप राहणार नाही; परंतु आता बहुसदस्यीय पद्धतीमुळे ते अशक्य आहे. चार सदस्य एखाद्या प्रभागातून निवडून आले तर जबाबदार कोणाला धरायचे, हा प्रश्न मतदारांना पडणार आहे, असे सरोदे म्हणाले.सामान्य कार्यकर्ता, लहान लहान पक्ष यांना संपविण्याचे काम बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे होणार आहे. यातून पारदर्शकता नष्ट होणार आहे. कायद्याचा केलेले गैरवापर हा अतिशय चुकीचा आहे. म्हणूनच मतदारांनीच आता पुढे आले पाहिजे. बहुसदस्यीय प्रभाग रचना आम्हाला नको आहे म्हणून मतदारांनीच सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार उपस्थित होते.४७ टक्के मतदारांचा विराेधपुण्यातील एका संस्थेने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग पद्धतीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ४७ टक्के मतदारांनी बहुसदस्य प्रभाग रचना करणे चुकीचे असल्याचे म्हटले असल्याचे सरोदे यांनी सांगितले.