शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महावितरण, ग्राहकांच्या संयमालाच करंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ...

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ग्राहकाकडून उचलले गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडल्याने काेणी कोणाला दोष द्यायचा असा पेच निर्माण झाला आहे. कोरोनामुळे ग्राहकराजा कंगाल झाला आहे, तर वसुली नसल्याने महावितरणही डबघाईला आले आहे. या दोघांच्या संयमालाच करंट बसला असून आता सरकारने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा नाही काढला तर दोघेही देशोधडीला लागणार एवढे मात्र निश्चित.

पावनेदोन वर्षांपासून कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार हिरावले. वीज वापरली आहे, म्हणजे बिल हे द्यावेच लागणार हे कळते. पण खायला पैसा उरला नाही तेथे वीज बिलासाठी पैसा आणायचा कुठून या विवंचनेत ग्राहक आहेत. पहिल्या लॉकडाऊन काळातील बिले माफ होतील या आशेवर ग्राहक राहिले. शासनाने हात वर केल्याचे लक्षात आल्यानंतर नव्या वर्षापासून ग्राहकांनी नव्या रोजगाराची वाट धरली, जरा जम बसतोय नाही तोवर एप्रिलपासून पुन्हा कोरोना वाढला आणि जो लॉकडाऊन झाला त्यातून अजूनही सुटका झालेली नाही. सर्वसामान्य ग्राहक घरखर्चाचा हिशेब सांभाळता सांभाळता मेटाकुटीला आला आहे. त्यात भरीस भर म्हणून पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलासह रोजच्या किराणा सामानातही महागाईने कहर केल्याने बचतीचे तीन तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत वीज बिलांची थकबाकी भरायची म्हटली तर किमान चार पाच हजारांवर आकडा गेला आहे. एका दमात ते भरणे शक्य नसल्याने हफ्ते पाडून मिळतील अशी ग्राहकाची अपेक्षा. पण ती पूर्ण होत नसल्याने ग्राहक हतबल आहेत.

ग्राहकांची ही परिस्थिती असताना, महावितरणचे सर्व काही आलबेल आहे, अशातील परिस्थिती नाही. ग्राहकांकडून वसुलीच थांबल्याने वीज खरेदी, वितरणासह कामगारांचा खर्च कशातून भागवायचा याची विवंचना आहे. लोकप्रतिनिधी, ग्राहकांकडून दबाव येत असला तरी कंपनी बंद पडण्यापासून वाचविण्यासाठी वसुली मोहीम तीव्र करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. रक्कम वसूल होत नाही तर थेट वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

चौकट

जिल्ह्याची ३३७ कोटी ४६ लाख थकबाकी

जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ६४४ ग्राहकांकडे ३३७ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४ लाख १ हजार ३०३ ग्राहकांकडे १८० कोटी ५१ लाख रुपये तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या ५००९ वीजजोडण्यांचे १५२ कोटी २६ लाख रुपये थकले आहेत.

चौकट

हप्ते पाडून देऊ पण कधी

वीज थकबाकीदारांची वीज तोडू नका, बिल भरण्यासाठी हप्ते पाडून द्या अशा सूचना कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना केल्या होत्या. पण त्यांची पाठ फिरल्यानंतर लगेचच वीज जोडण्या खंडित केल्या जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह उद्योजकांकडूनही संताप व्यक्त होत आहे. याबाबत शनिवारी आम आदमी पार्टीने महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर हप्ते पाडून देण्याचा पुनरुच्चार महावितरणकडून करण्यात आला.