शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

‘अमृत’ला कोथळीतून पाण्यासाठी हालचाली : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतून होणार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:17 IST

संतोष बामणे।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समजल्यानंतर, आता शिरोळ तालुक्यातील दानोळीनंतर कोथळी व सांगली जिल्हा एकवटणार आहे. त्यामुळे वारणा नदीतून इचलकरंजी ...

ठळक मुद्देमंगळवारच्या बैठकीत मांडणार मुद्दा

संतोष बामणे।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समजल्यानंतर, आता शिरोळ तालुक्यातील दानोळीनंतर कोथळी व सांगली जिल्हा एकवटणार आहे. त्यामुळे वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही. या मागणीवर वारणाकाठची जनता ठाम असून, कोथळीतून एकही इंच जमीन न देण्याचा निर्णय कोथळी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

दानोळी येथील वारणा बचाव समितीने पुढाकार घेतल्यानंतर वारणाकाठावरील मोठ्या संख्येने गावे एकवटली व इचलकरंजी शहराच्या ‘अमृत’ योजनेला विरोध केला. सध्या वारणा बचाव कृती समितीने गावागावांत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठच इचलकरंजीनेही उपोषणाला सुरुवात केली आहे. अशातच लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कोणता तोडगा काढायचा व कोणत्या पद्धतीने इचलकरंजी शहरासाठी पाणी देता येईल, अशा योजना आखल्या जात आहेत. त्यामुळे आता दानोळीकरांनी विरोध दर्शविल्यानंतर कोथळी येथील कृष्णा-वारणा संगम ठिकाणावरून इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा घाट रचला जात आहे.

तर मुंबई येथे २२ मे रोजी ‘अमृत’ योजनेच्या समन्वयासाठी बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे कोथळी-हरिपूर येथील वारणा-कृष्णा संगमाच्या डोहातून इचलकरंजीची अमृत योजना व्हावी, असा मुद्दा मांडला जाणार आहे. तर सध्या हा मुद्दा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या चर्चेत आल्यानंतर सांगलीचे माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी काहीही झाले तरी इचलकरंजी शहराला कोथळी-हरिपूर येथून पाणी द्यायचे नाही, या भूमिकेवर ठाम असून, सांगली जिल्हाही वारणा बचाव कृती समितीच्या म्हणण्यावर ठाम आहे. तसेच इचलकरंजी शहराला जर संगमातून पाणी दिले, तर ताकारी, म्हैसाळसारख्या योजनांना पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्वच गावे अमृत योजनेविरोधात एकवटत आहेत.

तर इचलकरंजी शहरासाठी दानोळीनंतर कोथळी गावातून ‘अमृत’ योजना न्यायची झाल्यास गावातून एक इंचही जमीन मिळणार नाही, या भूमिकेवर नागरिक ठाम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृष्णा-वारणा संगमातून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही, अशी जनतेची भूमिका आहे. सध्या वारणाकाठाबरोबर कृष्णाकाठावर असलेल्या उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, अंकली, हरिपूर, धामणी यासह अनेक गावांनी पुढाकार घेतला असून, संगमातूनही पाणी मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी दानोळीनंतर आता कोथळी गावाचा विचार केला असेल, तर कोथळीच्या ग्रामस्थांनी ‘अमृत’ योजनेच्या विरोधात चांगलीच मोट बांधली आहे.नगरसेवकांच्या जमिनीला पाणीकृष्णा नदीतून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा केला जातो. इचलकरंजीतील नगरसेवकांनी शिरढोण व टाकवडे परिसरात जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनींना पाणीपुरवठा करण्यासाठी इचलकरंजी शहराच्या पाईपलाईनमधून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मग गळतीही नगरसेवकांच्या घरात मुरत आहे आणि वारणाकाठच्या लोकांना वेठीस धरून आमच्या हक्काचे पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास शिरोळची जनता गप्प बसणार नसल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वारणाकाठावरून इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना इचलकरंजी शहराला वारणेचे पाणी कशासाठी पाहिजे. सध्याची मजरेवाडीतून असलेली कृष्णा योजनेची पाईपलाईन दुरुस्त करून घ्यावी. त्याचबरोबर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून इचलकरंजी शहराला पाणी घ्यावे. आता जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी जर कोथळीवर डोळा ठेवला असेल तर जनता गप्प बसणार नाही.- संजय नांदणे, कोथळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई