शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धरणात बुडून दोन मुलांसह मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST

चिपळूण (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मयुरी ...

चिपळूण (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मयुरी बाबाराम चौगुले (वय ३५), हर्ष बाबाराम चौगुले (११), शारदा बाबाराम चौगुले (१३, सर्व रा. असुर्डे) अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी सकाळी ही घटना घडली; मात्र बुधवारी पहाटे तीन वाजता ही घटना उघडकीस आली. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात बाबाराम हेरू चौगुले शिपाई म्हणून काम करतात. त्यांना पत्नी मयुरी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची पत्नी लाकडे गोळा करण्यासाठी आपल्या छोट्या दोन मुलांसह असुर्डे धरणाच्या काठावर गेल्या होत्या.

सायंकाळी बाबाराम चौगुले हे कामावरून घरी आल्यानंतर महाविद्यालयातून आलेल्या मुलींकडे पत्नी आणि छोट्या मुलांविषयी चौकशी केली असता ती लाकडे आणण्यासाठी गेली होती, असे त्यांनी सांगितले. मयुरी चौगुले यांच्या कुंभारखणी येथील माहेरी चौकशी केली. मात्र, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी धरणाच्या काठावर त्या लाकडे तोडताना दिसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे धरण परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तेथे लाकडाची मोळी आणि मुलांचे कपडे दिसले. पहाटे तीन वाजता धरणाच्या पाण्यात या तिघांचे मृतदेह आढळले.