शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

कोल्हापूर जिल्हयात दोन वर्षात हजाराहून अधिक किलोमीटरचे अतिक्रमीत रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 17:00 IST

गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले पानंद-शेत रस्ते मोकळे करण्यावर भर

कोल्हापूर, दि. ०७ :  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

जनतेचे दैनंदिन प्रश्न आणि समस्यांची गावातच सोडविण्याच्यादृष्टीने जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले की, महाराजस्व अभियांनाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान करण्यावर भर दिला असून या अभियानातून गावागावात शिबिरांचे आयोजन करुन जनतेला लागणारे दाखले, प्रमाणपत्रे यासह अन्य अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, यामध्ये प्रामुख्याने गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला.

गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2015-2016 तसेच सन 2016-2017 या दोन वर्षात जिल्हयात 1 हजार 44 किलोमीटर लांबीच्या 877 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून जनतेसाठी रस्ते मोकळे करुन देण्यात आले आहेत.

यामध्ये करवीर तालुक्यात 219.04 कि.मी. लांबीचे 225 रस्ते, गगनबावडा तालुक्यात 26.50 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, पन्हाळा तालुक्यात 91.10 कि.मी. लांबीचे 68 रस्ते, शाहुवाडी तालुक्यात 18.52 कि.मी. लांबीचे 21 रस्ते, हातकणंगले तालुक्यात 62 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, शिरोळ तालुक्यात 21.85 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, राधानगरी तालुक्यात 83.20 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, कागल तालुक्यात 91.90 कि.मी. लांबीचे 65 रस्ते, भुदरगड तालुक्यात 58.50 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, आजरा तालुक्यात 75.21 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, गडहिंग्जल तालुक्यात 156.91 कि.मी. लांबीचे 91 रस्ते आणि चंदगड तालुक्यातील 138.90 कि.मी. लांबीचे 143 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून ते मोकळे करण्यात आले आहेत. यापुढेही ही मोहिम गतीमान करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा