शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कोल्हापूर जिल्हयात दोन वर्षात हजाराहून अधिक किलोमीटरचे अतिक्रमीत रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 17:00 IST

गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले पानंद-शेत रस्ते मोकळे करण्यावर भर

कोल्हापूर, दि. ०७ :  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

जनतेचे दैनंदिन प्रश्न आणि समस्यांची गावातच सोडविण्याच्यादृष्टीने जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले की, महाराजस्व अभियांनाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान करण्यावर भर दिला असून या अभियानातून गावागावात शिबिरांचे आयोजन करुन जनतेला लागणारे दाखले, प्रमाणपत्रे यासह अन्य अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, यामध्ये प्रामुख्याने गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला.

गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2015-2016 तसेच सन 2016-2017 या दोन वर्षात जिल्हयात 1 हजार 44 किलोमीटर लांबीच्या 877 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून जनतेसाठी रस्ते मोकळे करुन देण्यात आले आहेत.

यामध्ये करवीर तालुक्यात 219.04 कि.मी. लांबीचे 225 रस्ते, गगनबावडा तालुक्यात 26.50 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, पन्हाळा तालुक्यात 91.10 कि.मी. लांबीचे 68 रस्ते, शाहुवाडी तालुक्यात 18.52 कि.मी. लांबीचे 21 रस्ते, हातकणंगले तालुक्यात 62 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, शिरोळ तालुक्यात 21.85 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, राधानगरी तालुक्यात 83.20 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, कागल तालुक्यात 91.90 कि.मी. लांबीचे 65 रस्ते, भुदरगड तालुक्यात 58.50 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, आजरा तालुक्यात 75.21 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, गडहिंग्जल तालुक्यात 156.91 कि.मी. लांबीचे 91 रस्ते आणि चंदगड तालुक्यातील 138.90 कि.मी. लांबीचे 143 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून ते मोकळे करण्यात आले आहेत. यापुढेही ही मोहिम गतीमान करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा