शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 14:17 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सत्तारूढ गटाकडे आले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा कारभार अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचा डाग न लावता केल्याची जाणीव सभासदांना आहे. तरीही धर्म-अधर्माची लढाई सुरू आहे. अर्जुनाच्या रूपाने ‘के. पीं’च्या हातात धनुष्यबाण दिला असून, श्रीकृष्ण म्हणून आपण व आमदार सतेज पाटील त्यांच्या सोबत असल्याने या लढाईत आम्हीच बाजी मारू. सत्तारूढ आघाडीची सर्व धुरा सतेज पाटील यांच्यावर सोपवली असून, त्यांचे राजकीय कौशल्य पाहता ते हा वेढा पार करतील, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची घोषणा शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात केली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, वीस वर्षांपूर्वी के. पी. पाटील यांच्या हातात कारभार आला. त्यांनी प्रत्येकवर्षी विक्रमी ऊसदर देत असतानाच २८ टक्के बोनस कर्मचाऱ्यांना देत आहेत. मागील निवडणुकीत सहवीज प्रकल्पावरून हेच विरोधक ‘के. पी. पाटील ‘बिद्री’चे पत्रे राखणार नाहीत, अशी टीका करत होते. मात्र, याच प्रकल्पातून कोट्यावधी रुपयांचा नफा होत आहे. आता इथेनॉल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘बिद्री’ देशातील नंबर वनचा कारखाना होईल. हे सगळे करत असताना ‘के. पीं.’नी कोणत्याही प्रकारचा डाग अंगाला लागू दिला नाही. सर्वोत्तम दर दिल्याने त्यासाठी आरशाची गरज नाही.कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ कसा चालवला हे सभासदांना चांगले माहिती आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. त्यांच्यावर मी आता बोलणार नाही. मतपेटीव्दारेच सभासदा त्यांना उत्तर देतील. यावेळी आमदार सतेज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, धैर्यशील देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील-बाचणीकर आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांची आदलाबदलभाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आमच्याकडे आले तर आमचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांची आदलाबदल झाल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘ए. वाय.’ यांच्यावरील प्रेम पातळसहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पक्षीय राजकारण वेगळे असते, हे जरी खरे असले तरी ए. वाय. पाटील यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. हे सगळे जड असले तरी त्यांच्यावरील प्रेम पातळ झाले हे निश्चित आहे. ठीक आहे, राजकारणात जे येतील त्यांना घेऊन व येणार नाहीत त्यांना सोडून लढाई करावी लागते, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

हे आहेत आघाडीचे नेते..पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटील