शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 14:17 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सत्तारूढ गटाकडे आले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा कारभार अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचा डाग न लावता केल्याची जाणीव सभासदांना आहे. तरीही धर्म-अधर्माची लढाई सुरू आहे. अर्जुनाच्या रूपाने ‘के. पीं’च्या हातात धनुष्यबाण दिला असून, श्रीकृष्ण म्हणून आपण व आमदार सतेज पाटील त्यांच्या सोबत असल्याने या लढाईत आम्हीच बाजी मारू. सत्तारूढ आघाडीची सर्व धुरा सतेज पाटील यांच्यावर सोपवली असून, त्यांचे राजकीय कौशल्य पाहता ते हा वेढा पार करतील, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची घोषणा शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात केली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, वीस वर्षांपूर्वी के. पी. पाटील यांच्या हातात कारभार आला. त्यांनी प्रत्येकवर्षी विक्रमी ऊसदर देत असतानाच २८ टक्के बोनस कर्मचाऱ्यांना देत आहेत. मागील निवडणुकीत सहवीज प्रकल्पावरून हेच विरोधक ‘के. पी. पाटील ‘बिद्री’चे पत्रे राखणार नाहीत, अशी टीका करत होते. मात्र, याच प्रकल्पातून कोट्यावधी रुपयांचा नफा होत आहे. आता इथेनॉल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘बिद्री’ देशातील नंबर वनचा कारखाना होईल. हे सगळे करत असताना ‘के. पीं.’नी कोणत्याही प्रकारचा डाग अंगाला लागू दिला नाही. सर्वोत्तम दर दिल्याने त्यासाठी आरशाची गरज नाही.कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ कसा चालवला हे सभासदांना चांगले माहिती आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. त्यांच्यावर मी आता बोलणार नाही. मतपेटीव्दारेच सभासदा त्यांना उत्तर देतील. यावेळी आमदार सतेज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, धैर्यशील देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील-बाचणीकर आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांची आदलाबदलभाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आमच्याकडे आले तर आमचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांची आदलाबदल झाल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘ए. वाय.’ यांच्यावरील प्रेम पातळसहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पक्षीय राजकारण वेगळे असते, हे जरी खरे असले तरी ए. वाय. पाटील यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. हे सगळे जड असले तरी त्यांच्यावरील प्रेम पातळ झाले हे निश्चित आहे. ठीक आहे, राजकारणात जे येतील त्यांना घेऊन व येणार नाहीत त्यांना सोडून लढाई करावी लागते, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

हे आहेत आघाडीचे नेते..पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटील