शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

..त्यासाठी आमचे सरकार यावे लागले; मंत्री दीपक केसरकरांचा महाविकास आघाडीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 18:11 IST

त्यासाठी आमचे सरकार यावे लागले

कोल्हापूर : याआधीचं सरकार हे बोलणारं सरकार होतं आणि आत्ताच सरकार हे काम करणारं सरकार आहे अशा शब्दांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीला मंगळवारी टोला लगावला.

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांना वीज माफक दरात मिळावी हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होतं. आधीच्या सरकारने ते केलं नाही. परंतु आम्ही मात्र याबाबत निर्णय घेतला. पेट्राेल-डिझेलच्या दरवाढीने नागरिकांना झळ बसत होती. परंतु आधीच्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यासाठी आमचे सरकार यावे लागले. दिवाळी गोड करण्यासाठी आधीच्या सरकारने काही केलं नाही. आम्ही ४०० रुपयांच्या वस्तू १०० रुपयात द्यायला सुरू केल्यावर त्या कुठे वेळेत मिळाल्या नाहीत म्हणून टीका करायची हे बरोबर नाही. भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीसाठी ९७० कोटी द्यायचे होते. तेवढेही यांनी दिले नाहीत. स्वार्थाच्या कामाला हे पैसे वळवले असा आरोपही केसरकर यांनी केला.

कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असे सांगून केसरकर म्हणाले की, गेले काही महिने केवळ आमच्या टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मागणी केल्याचे ऐकून बरे वाटले.उद्धव यांच्याबद्दल आदर आहे. परंतु जलयुक्त शिवार योजना बंद करताना तुम्हाला समोर शेतकरी का दिसला नाही, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.

प्रक्रिया आणि साठवणुकीवर भर

शेतकऱ्यांना दोन पिके कशी घेता येतील, शेतमालावर प्रक्रिया कशी करता येईल आणि साठवणूक कशी करता येईल यासाठी चर्चा सुरू असून एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प लवकरच घोषित होईल असे सूताेवाचही केसरकर यांनी केले.

सोशल मीडियाचाही करणार वापर

सध्या समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारही सोशल मीडियाचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी