शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

..त्यासाठी आमचे सरकार यावे लागले; मंत्री दीपक केसरकरांचा महाविकास आघाडीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 18:11 IST

त्यासाठी आमचे सरकार यावे लागले

कोल्हापूर : याआधीचं सरकार हे बोलणारं सरकार होतं आणि आत्ताच सरकार हे काम करणारं सरकार आहे अशा शब्दांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीला मंगळवारी टोला लगावला.

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांना वीज माफक दरात मिळावी हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होतं. आधीच्या सरकारने ते केलं नाही. परंतु आम्ही मात्र याबाबत निर्णय घेतला. पेट्राेल-डिझेलच्या दरवाढीने नागरिकांना झळ बसत होती. परंतु आधीच्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यासाठी आमचे सरकार यावे लागले. दिवाळी गोड करण्यासाठी आधीच्या सरकारने काही केलं नाही. आम्ही ४०० रुपयांच्या वस्तू १०० रुपयात द्यायला सुरू केल्यावर त्या कुठे वेळेत मिळाल्या नाहीत म्हणून टीका करायची हे बरोबर नाही. भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीसाठी ९७० कोटी द्यायचे होते. तेवढेही यांनी दिले नाहीत. स्वार्थाच्या कामाला हे पैसे वळवले असा आरोपही केसरकर यांनी केला.

कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असे सांगून केसरकर म्हणाले की, गेले काही महिने केवळ आमच्या टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मागणी केल्याचे ऐकून बरे वाटले.उद्धव यांच्याबद्दल आदर आहे. परंतु जलयुक्त शिवार योजना बंद करताना तुम्हाला समोर शेतकरी का दिसला नाही, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.

प्रक्रिया आणि साठवणुकीवर भर

शेतकऱ्यांना दोन पिके कशी घेता येतील, शेतमालावर प्रक्रिया कशी करता येईल आणि साठवणूक कशी करता येईल यासाठी चर्चा सुरू असून एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प लवकरच घोषित होईल असे सूताेवाचही केसरकर यांनी केले.

सोशल मीडियाचाही करणार वापर

सध्या समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारही सोशल मीडियाचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी