शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते कसे चालते, मंत्री छगन भुजबळांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:31 IST

दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती

कोल्हापूर : फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुसती चौकशी सुरू आहे, कारवाई झालेली नाही. तोपर्यंत भाजपने राज्यभर दंगा सुरू केला आहे. ‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते भाजप नेत्यांना कसे चालते? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री भुजबळ हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री भुजबळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री पदाला वेगळा दर्जा असतो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घराकडे गेले. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे हे भाजपने ठरवले आहे. त्यांची ही गोबेल्स नीती आहे.

राज्य सरकारला येनकेन प्रकारे त्रास देणे, अटक करणे, ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा भाजप पुरेपूर वापर करत आहे. मात्र जोपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे सरकारबाबत ठाम आहेत तोपर्यंत सरकार कोणीही पाडू शकणार नसल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

चौकशी यंत्रणेने मंत्री नवाब मलिक यांना अटक करून अन्याय केला आहे, आता आम्ही राजीनामा घेऊन आणखी अन्याय करणार नाही. न्यायालयात पुरावे सादर होऊ देत, मग बघू. ते मुस्लीम समाजाचे आहेत, म्हणून ‘ईडी’ ५५ चे ५ लाख करून दाऊदशी संबध जोडणार असेल तर हे चालणार नाही.

दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही नीती भाजपची असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

भाजपचा चढता सुरज...खाली खाली

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार पुन्हा आले असले तरी त्यांचे ५० आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे देशभरात भाजपचा चढता सुरज हळूहळू खाली येत असल्याची टीका मंत्री भुजबळ यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChagan Bhujbalछगन भुजबळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा