शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते कसे चालते, मंत्री छगन भुजबळांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:31 IST

दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती

कोल्हापूर : फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुसती चौकशी सुरू आहे, कारवाई झालेली नाही. तोपर्यंत भाजपने राज्यभर दंगा सुरू केला आहे. ‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते भाजप नेत्यांना कसे चालते? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री भुजबळ हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री भुजबळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री पदाला वेगळा दर्जा असतो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घराकडे गेले. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे हे भाजपने ठरवले आहे. त्यांची ही गोबेल्स नीती आहे.

राज्य सरकारला येनकेन प्रकारे त्रास देणे, अटक करणे, ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा भाजप पुरेपूर वापर करत आहे. मात्र जोपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे सरकारबाबत ठाम आहेत तोपर्यंत सरकार कोणीही पाडू शकणार नसल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

चौकशी यंत्रणेने मंत्री नवाब मलिक यांना अटक करून अन्याय केला आहे, आता आम्ही राजीनामा घेऊन आणखी अन्याय करणार नाही. न्यायालयात पुरावे सादर होऊ देत, मग बघू. ते मुस्लीम समाजाचे आहेत, म्हणून ‘ईडी’ ५५ चे ५ लाख करून दाऊदशी संबध जोडणार असेल तर हे चालणार नाही.

दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही नीती भाजपची असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

भाजपचा चढता सुरज...खाली खाली

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार पुन्हा आले असले तरी त्यांचे ५० आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे देशभरात भाजपचा चढता सुरज हळूहळू खाली येत असल्याची टीका मंत्री भुजबळ यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChagan Bhujbalछगन भुजबळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा