शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

किमान वेतनप्रश्नी अवमान याचिका

By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST

यंत्रमाग कामगार : लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचा निर्णय

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन फेररचनेचा आदेश सुमारे ४० दिवसांपूर्वी शासनाने जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करण्यात यावी; अन्यथा कामगार संघटनेला शासन व कामगार मंत्रालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा येथील लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने दिला आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांना सन १९८६ पासून किमान वेतनाची फेररचना करण्यात आली नाही. त्यामुळे गेली ३० वर्षे यंत्रमाग उद्योगातील कामगार किमान वेतनापासून वंचित राहिला आहे. याबाबत लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने, यंत्रमाग कामगार वेतन फेररचना ताबडतोब जाहीर करावी, असे आदेश सरकारला दिले होते. त्याप्रमाणे शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने २९ जानेवारीला यंत्रमाग कामगारांसाठी, तसेच या उद्योगात असलेल्या अन्य घटकांच्या कामगारांसाठी किमान वेतनाची फेररचना जारी केली आहे. राज्यात इचलकरंजीबरोबरच माधवनगर-सांगली, विटा, सोलापूर, भिवंडी, मालेगाव, येवला, नागपूर अशा व्यापक क्षेत्रांमध्ये असलेल्या यंत्रमाग उद्योगांमध्ये वीस लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन फेररचनेचा या सर्व कामगारांना लाभ मिळणार आहे. २९ जानेवारीला नवीन किमान वेतन फेररचना जारी झाली असली तरी यंत्रमाग केंद्रामधील कामगारांना या फेररचनेप्रमाणे वेतन मिळत नाही. म्हणून लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने हा इशारा सरकारला दिला आहे, अशी माहिती कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, आदींनी दिली. (प्रतिनिधी)