शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बाजारपेठेतील गर्दी प्रशासनाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

काेल्हापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती, तिची मुदत दि. १५ मे पर्यंत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली. मात्र ...

काेल्हापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती, तिची मुदत दि. १५ मे पर्यंत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली. मात्र या दरम्यान रोज सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व भाजी मंडई सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. गोकूळ दूध संघाची निवडणूक ही याच दरम्यान सुरू होती. त्यामुळे संचारबंदी लागू करूनही काही केल्या कोरोनावर नियंत्रण मिळविता आले नाही. उलट कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आता शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला जात आहे, या दरम्यान कोणाही व्यक्तीला आपले राहते घर सोडून रस्त्यावर येता येणार नाही.

लॉकडाऊनची कुणकुण लागताच गेल्या तीन चार दिवसापासून नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करायला सुरवात केली. सकाळच्या सत्रात चार तास दुकाने उघडी राहिल्यामुळे या चार तासातच प्रचंड गर्दी होत आहे. परंतु सकाळी अकरा वाजेपर्यंत लोकांना रोखताही येत नाही. त्यामुळे होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. भाजीपाला, धान्य तसेच किराणा माल घेण्याकरिता नागरिक दुकानांसमोर रांगा लावत आहेत.

गुरुवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यावर, बाजारपेठेत, भाजी मंडईतून गर्दी उसळली होती. दुकानदारांनी बऱ्यापैकी सोशल डिस्टंन्स राखण्यात यश मिळविले होते, परंतु भाजी मंडईत त्याचे कोणालाच भान रहात नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी, बाजारात लोकांची गर्दी होती. सकाळी साडेअकरा वाजल्यानंतर मात्र पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्तीने लोकांचे बाजार उठविले.

शहरात महाराणा प्रताप चौक, लुगडी ओळ येथील वडाप रिक्षा थांब्यावर अनेक रिक्षा प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. प्रवासी मिळतील तशा या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत होत्या. एकीकडे केएमटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली असताना दुसरीकडे रिक्षाची वडाप वाहतुक सुरू होती. पेट्रोलपंप सुरू होते.

- फोटो ओळी स्वतंत्र टाकतो.