शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीला रोज एक नवरा

By admin | Updated: November 16, 2014 00:50 IST

चौकशी, कारवाईचे शुक्लकाष्ठ संपता संपेना

 राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून वैभव प्राप्त केलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमागील तक्रारी, चौकशी, कारवाईचे शुक्लकाष्ठ संपता संपेना झाले आहे. गेले तीन वर्षे संचालक, प्रशासक, अशासकीय मंडळ व पुन्हा प्रशासक अशा फेऱ्यात समिती अडकली आहे. समितीच्या कारभाराचा रोज एक अधिकारी चार्ज घेत आहे. न्यायालयीन दाव्यांसाठी समितीचे लाखो रुपये खर्ची पडत आहेत. पैसे गेले; पण त्याबरोबर शाहूंच्या नावाने सुरू असलेल्या समितीची पुरती बदनामी सुरू आहे. त्याबद्दल राजकीय पुढाऱ्यांना काहीच सोयरसुतक नाही. समितीला रोज एक नवरा मिळत असून, तिने नेमका कुणाबरोबर संसार करायचा हेच समजेनासे झाल्याची बोलकी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी १८९५ मध्ये कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ वसविली. गुजरातमधील व्यापाऱ्यांना शाहूपुरी येथे जागा देऊन गूळ व्यवसायाला चालना दिली. दूरदृष्टी ठेवून त्यांनी बाजारपेठ वसवल्याने अल्पावधीतच समिती नावारूपास आली. त्यानंतर समितीने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली; पण निवडणुका झाल्या की एकदिलाने समितीचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच काम केले. त्यामुळे समितीची भरभराट होण्यास वेळ लागला नाही. या काळात समितीची निवडणूक झाली कधी, हेच लोकांना कळत नव्हते. खऱ्या अर्थाने २००२ पासूनच समिती व तिचा कारभार चर्चेत आला. नंदकुमार वळंजू यांनी व्यापारी मतदानावरून न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण वर्ष-दीड वर्ष गाजले. यावेळी सत्तारूढ व विरोधकांत अंतर्गत कुरघोड्या होत्याच; पण त्याची उघड वाच्यता नव्हती. त्यानंतर बाजार समितीच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा ऐरणावर आला. प्रत्येक तालुक्याची बाजार समिती काबीज करण्यासाठी कॉँग्रेसने ताकद लावली, तर ती अखंडित राहण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले. २००७ च्या निवडणुकीच्या तोंडावरच समितीचे लाखो रुपये खर्च झाले. याच काळात समिती आर्थिक अरिष्टात सापडली. पणन मंडळाकडून कर्ज काढून निवडणूक घेण्याची नामुष्की आली. त्यानंतर संचालकांनी समितीला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न करीत कर्जाचा डोंगर कमी केला; पण भूखंड वाटप, बेकायदेशीर नोकरभरती यांसारख्या गोष्टीही केल्याने तक्रारी, चौकशी व न्यायालयीन लढाई सुरू झाली. समितीचे संचालक, प्रशासक व अशासकीय सदस्यांनी समितीत बसून कायद्याचा काथ्याकूट करून आपली खुर्ची वाचविण्यापलीकडेच काहीच केले नाही. यामध्ये समितीचे लाखो रुपये खर्च झाले. केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी न्यायालयात याचिकेवर याचिका दाखल करण्याचा सपाटाच या मंडळींनी लावला. आता तर कहरच झाला. रोज एक कारभारी समितीत येत असल्याने कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्यासारखी स्थिती आहे. या समितीचा कारभार पाहणारे संचालक मंडळ कोणत्याही पक्षाचे असो, प्रत्येकाने समितीचे रक्त शोषणाचेच काम केले आहे. समितीचा पैसा म्हणजे माझ्या बापाची तिजोरी असल्यासारखेच अनेकांना वाटते. म्हणूनच ऐनकेन मार्गाने तिथे सत्तेत जाण्यासाठी उड्या पडतात. आताही जो बाजार सुरू आहे, त्याच्या मुळाशी ही लुटीची हावच आहे.