शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार, तोडणी खर्चावर मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:22 IST

FRP : यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

कोल्हापूर : साखरेच्या कोंडीमुळे एफआरपीचे तुकडे अटळ असल्याचे करारपत्र लिहून घेणाऱ्या कारखानदारांनी शनिवारी तोडग्यासाठी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत अवघ्या दहा मिनिटात एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले, पण मजुरीवाढीमुळे घटलेली १४ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना द्या व हा खर्च कारखान्यांनी करावा अशी मागणी लावून धरली, कारखानदारांनी प्रतिसाद न दिल्याने बैठकीतून बाहेर येऊन संघटनेने हा निर्णय होईपर्यंत धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असला तरी एकरकमी एफआरपीवर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीमधूनही किमान २८०० ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळणार असल्याने हाच तोडगा होण्याची शक्यता आहे. दराचा निर्णय झाला तरी हंगाम दिवाळी झाल्यावरच गती घेणार आहे.जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे, पण ऊस परिषद झाल्याशिवाय हंगाम घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या २० व्या उस परिषदेच्या दोन दिवस आधीच शनिवारी शासकीय विश्रामगृहावर कारखानदारांची बैठक झाली.

भाजप कारखानदारांची पाठबैठकीत भाजपशी संबंधित शाहू, राजाराम, वारणा कारखान्यांच्या प्रतिनिधीनी पाठ फिरवली. समरजित घाटगे, आमदार विनय काेरे, महादेवराव महाडीक बैठकीला अनुपस्थित होते. शिवाय या बैठकीला स्वाभिमानी वगळता अन्य शेतकरी संघटनांना आमंत्रणही नव्हते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर