शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 20:19 IST

Raju Shetty : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा यावेळी मोठा मताधिक्क्याने पराभव झाला. दरम्यान, आता शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Raju Shetty ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मविआ आधी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडणार अशा चर्चा सुरू होत्या, पण शेवटच्या क्षणी या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आता राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार? आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची सध्या आवश्यक्ता नाही.  गोवा, नांदेड, लातूर या सगळीकडे जाण्यासाठी महामार्ग आहे. आता पुन्हा त्याच दिशेला जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही. आता आहे त्याच टोल नाक्यांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत, यावरुन असं लक्षात येतं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना शक्तिपीठच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करायचा आहे, जसा समृद्धी महामार्गातून मिळवला, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 

'यातून अनेकांची समृद्धी केली आणि आमदार खासदारांच्या खरेदीचा भाव वधारला. आता नेमकी कशाची खरेदी करायची आहे कुणाला आर्थिक शक्ती द्यायची आहे, असा सवालही राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे, बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मार्ग होऊ द्यायचा नाही असा निर्धार केला आहे, असंही शेट्टी म्हणाले. 

राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

"लोकसभा निवडणुकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, खरंतर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडणून आल्यानंतर काय भूमिका घेणार याबाबत ड्राफ्ट तयार केला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील, बंटी पाटील यांनी  तयार केला होता. पण, नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. सहा महिन्यापासून ते आम्ही ही जागा सोडली असं सांगत होते. त्यांना वाटत होतं मी उमेदवार आहे त्यांच्या नेत्यांना भेटायला हवं. मी तसे सगळ्यांना भेटलो होतो. पण शेवटी या नेत्यांनी जे करायचं होतं तेच केलं, असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४