शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 11:28 IST

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभ. जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna)माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. जिल्ह्यातील ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र होते, त्यापैकी आतापर्यंत ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अद्याप एक हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

 राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या योजनेची घोेषणा करत असतानाच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून ५१ हजार ७६१ इतके अर्ज प्राप्त झाले होते. शासनाच्या निकषानुसार त्यापैकी ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र ठरले. संबधितांना आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४८ हजार ४२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्यापैकी ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावर २८५ कोटी ४२ लाख रुपये कर्जमाफीचे जमा झाले. उर्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ५८१ शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर प्रमाणीकरणामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ४३७ जणांचे प्रमाणीकरण अडकले आहे. असे १ हजार १८ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभदेवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती. यामध्ये थकबाकीदार, ‘ओटीएस’ व प्रोत्साहनपर अशा तीन टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. तिन्ही प्रकारांत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. त्या तुलनेत महात्मा फुले योजनेतून आतापर्यंत लाभ कमी मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दृष्टिक्षेपात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना -अर्ज केलेले खातेदार -५१ हजार ७६१पात्र खातेदार - ४८ हजार ८५७यापैकी जिल्हा बँक - ३१ हजार ३२६, इतर बँका - १७ हजार ५३१.आधार प्रमाणीकरण पूर्ण - ४८ हजार ४२०अपूर्ण - ४३७रक्कम वितरीत केलेले शेतकरी - ४७ हजार ८३९, रक्कम -२८५ कोटी ४२ लाखतकारी असलेली एकूण खाती - १७८५तक्रार निवारण केलेली - ५१८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज