शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 11:28 IST

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभ. जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna)माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. जिल्ह्यातील ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र होते, त्यापैकी आतापर्यंत ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अद्याप एक हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

 राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या योजनेची घोेषणा करत असतानाच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून ५१ हजार ७६१ इतके अर्ज प्राप्त झाले होते. शासनाच्या निकषानुसार त्यापैकी ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र ठरले. संबधितांना आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४८ हजार ४२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्यापैकी ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावर २८५ कोटी ४२ लाख रुपये कर्जमाफीचे जमा झाले. उर्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ५८१ शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर प्रमाणीकरणामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ४३७ जणांचे प्रमाणीकरण अडकले आहे. असे १ हजार १८ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभदेवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती. यामध्ये थकबाकीदार, ‘ओटीएस’ व प्रोत्साहनपर अशा तीन टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. तिन्ही प्रकारांत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. त्या तुलनेत महात्मा फुले योजनेतून आतापर्यंत लाभ कमी मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दृष्टिक्षेपात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना -अर्ज केलेले खातेदार -५१ हजार ७६१पात्र खातेदार - ४८ हजार ८५७यापैकी जिल्हा बँक - ३१ हजार ३२६, इतर बँका - १७ हजार ५३१.आधार प्रमाणीकरण पूर्ण - ४८ हजार ४२०अपूर्ण - ४३७रक्कम वितरीत केलेले शेतकरी - ४७ हजार ८३९, रक्कम -२८५ कोटी ४२ लाखतकारी असलेली एकूण खाती - १७८५तक्रार निवारण केलेली - ५१८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज