शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महात्मा फुले कर्जमुक्तीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, योजनेला दोन वर्षे पूर्ण, तरीही पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 11:28 IST

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभ. जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna)माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. जिल्ह्यातील ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र होते, त्यापैकी आतापर्यंत ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अद्याप एक हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

 राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या योजनेची घोेषणा करत असतानाच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून ५१ हजार ७६१ इतके अर्ज प्राप्त झाले होते. शासनाच्या निकषानुसार त्यापैकी ४८ हजार ८५७ शेतकरी पात्र ठरले. संबधितांना आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४८ हजार ४२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्यापैकी ४७ हजार ८८१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावर २८५ कोटी ४२ लाख रुपये कर्जमाफीचे जमा झाले. उर्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ५८१ शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर प्रमाणीकरणामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ४३७ जणांचे प्रमाणीकरण अडकले आहे. असे १ हजार १८ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

‘महात्मा फुलें’पेक्षा ‘शिवाजी महाराज’ योजनेचा अधिक लाभदेवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती. यामध्ये थकबाकीदार, ‘ओटीएस’ व प्रोत्साहनपर अशा तीन टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. तिन्ही प्रकारांत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ३७३ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. त्या तुलनेत महात्मा फुले योजनेतून आतापर्यंत लाभ कमी मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दृष्टिक्षेपात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना -अर्ज केलेले खातेदार -५१ हजार ७६१पात्र खातेदार - ४८ हजार ८५७यापैकी जिल्हा बँक - ३१ हजार ३२६, इतर बँका - १७ हजार ५३१.आधार प्रमाणीकरण पूर्ण - ४८ हजार ४२०अपूर्ण - ४३७रक्कम वितरीत केलेले शेतकरी - ४७ हजार ८३९, रक्कम -२८५ कोटी ४२ लाखतकारी असलेली एकूण खाती - १७८५तक्रार निवारण केलेली - ५१८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज