शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

महाराष्ट्र देशभरातील पाणी वापर संस्थांचा अभ्यास करणार, जलसंपदा विभागाचा निर्णय

By विश्वास पाटील | Updated: September 24, 2022 16:18 IST

पाणी वापर संस्थांचा अभ्यास करण्यासाठी मे'मध्ये नियुक्त केलेल्या अभ्यास गटास शासनाने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्र देशातील इतर राज्यांतील पाणी वापर संस्थांचा अभ्यास करणार आहे. जलसंपदा विभागाने त्यासंबंधीचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यासाठीच पाणी वापर संस्थांचा अभ्यास करण्यासाठी मे'मध्ये नियुक्त केलेल्या अभ्यास गटास शासनाने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.सहभागी सिंचन धोरणांतर्गत महाराष्ट्रात २००५ मध्ये सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीबाबत विचार करण्यासाठी व या कायद्यात बदल करण्यासाठी सरकारला सतरा वर्षांनी जाग आला. त्यानुसार जलसंपदा विभागाने २४ मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला.या अभ्यास गटाने तीन महिन्यांत अहवाल देण्याचे सुचविण्यात आले होते; परंतु इतर राज्यांच्या पाणी वापर संस्थांचा (मॉडेल स्टडी) अभ्यास करणे, महामंडळ स्तरावरील इतर पाणी वापर संस्थांबाबत उद्भवणाऱ्या अडचणी व समस्या यांचा अभ्यास करणे, त्यासाठी अधीक्षक व कार्यकारी अभियंता स्तरावर कार्यशाळा घेणे गरजेचे असल्याने हे काम तीन महिन्यांत करणे शक्य नव्हते. त्यामुळे या अभ्यास गटास ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

महाराष्ट्रातील पाणी वापर संस्था दृष्टिक्षेपातजानेवारी २०२२ पर्यंतचे चित्रएकूण संस्थांची नोंदणी - ५६५८त्यापैकी ३२१३ संस्थांना १२ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्र व्यवस्थापनाकरिता हस्तांतरित.

उपसा सिंचन योजनांचाही अभ्यास आवश्यकपाणी वापर संस्था मुख्यत्वे पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाडा व विदर्भात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कोल्हापूर पध्दतीचे बंधारेही बांधले आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पदरची गुंतवणूक करून या उपसा सिंचन संस्था स्थापन करून शेती पिकवली आहे. पाणी वापरप्रमाणेच शासनाने या संस्थांचाही अभ्यास करण्याची गरज आहे. बेनिक्रे (ता. कागल) येथील ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेचे काम राज्यात आदर्श मानले जाते.

पाणी वापर संस्था मजबूत करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात सिंचन व्यवस्था देण्यासारखे आहे. त्यातून पाण्याचा पर्याप्त वापर होईल. सिंचनासाठीच्या पाण्याची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. यापुढील काळात शेतीला मोजून पाणी देण्याचा व पाण्याचे हक्क शेतकऱ्यांनाच देण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे त्याची गरज म्हणून पाणी वापर संस्थांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. - लक्ष्मीकांत वाघवकर, पाणी वापर संस्थांचे अभ्यासक, नाशिक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी