शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र देशभरातील पाणी वापर संस्थांचा अभ्यास करणार, जलसंपदा विभागाचा निर्णय

By विश्वास पाटील | Updated: September 24, 2022 16:18 IST

पाणी वापर संस्थांचा अभ्यास करण्यासाठी मे'मध्ये नियुक्त केलेल्या अभ्यास गटास शासनाने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्र देशातील इतर राज्यांतील पाणी वापर संस्थांचा अभ्यास करणार आहे. जलसंपदा विभागाने त्यासंबंधीचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यासाठीच पाणी वापर संस्थांचा अभ्यास करण्यासाठी मे'मध्ये नियुक्त केलेल्या अभ्यास गटास शासनाने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.सहभागी सिंचन धोरणांतर्गत महाराष्ट्रात २००५ मध्ये सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीबाबत विचार करण्यासाठी व या कायद्यात बदल करण्यासाठी सरकारला सतरा वर्षांनी जाग आला. त्यानुसार जलसंपदा विभागाने २४ मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला.या अभ्यास गटाने तीन महिन्यांत अहवाल देण्याचे सुचविण्यात आले होते; परंतु इतर राज्यांच्या पाणी वापर संस्थांचा (मॉडेल स्टडी) अभ्यास करणे, महामंडळ स्तरावरील इतर पाणी वापर संस्थांबाबत उद्भवणाऱ्या अडचणी व समस्या यांचा अभ्यास करणे, त्यासाठी अधीक्षक व कार्यकारी अभियंता स्तरावर कार्यशाळा घेणे गरजेचे असल्याने हे काम तीन महिन्यांत करणे शक्य नव्हते. त्यामुळे या अभ्यास गटास ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

महाराष्ट्रातील पाणी वापर संस्था दृष्टिक्षेपातजानेवारी २०२२ पर्यंतचे चित्रएकूण संस्थांची नोंदणी - ५६५८त्यापैकी ३२१३ संस्थांना १२ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्र व्यवस्थापनाकरिता हस्तांतरित.

उपसा सिंचन योजनांचाही अभ्यास आवश्यकपाणी वापर संस्था मुख्यत्वे पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाडा व विदर्भात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कोल्हापूर पध्दतीचे बंधारेही बांधले आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पदरची गुंतवणूक करून या उपसा सिंचन संस्था स्थापन करून शेती पिकवली आहे. पाणी वापरप्रमाणेच शासनाने या संस्थांचाही अभ्यास करण्याची गरज आहे. बेनिक्रे (ता. कागल) येथील ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेचे काम राज्यात आदर्श मानले जाते.

पाणी वापर संस्था मजबूत करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात सिंचन व्यवस्था देण्यासारखे आहे. त्यातून पाण्याचा पर्याप्त वापर होईल. सिंचनासाठीच्या पाण्याची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. यापुढील काळात शेतीला मोजून पाणी देण्याचा व पाण्याचे हक्क शेतकऱ्यांनाच देण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे त्याची गरज म्हणून पाणी वापर संस्थांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. - लक्ष्मीकांत वाघवकर, पाणी वापर संस्थांचे अभ्यासक, नाशिक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी