शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Maharashtra Vidhan Sabha 2019 : टोलमुक्त केले, विमानसेवा सुरू, आता आयटी पार्क आणू : अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 18:08 IST

आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले.  

ठळक मुद्देटोलमुक्त केले, विमानसेवा सुरू, आता आयटी पार्क आणू : अमित शहाकोल्हापुरात महायुतीच्या सभेत पवार यांच्यावर टीकेचा भडिमार

कोल्हापूर : ‘मोदी-फडणवीस की राहुलबाबा-शरद पवार यांच्यापैकी तुम्हांला कुणाची निवड करायची आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत नंबर १ चे राज्य करून दाखवू. आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले.  

ढगाळ हवामानामुळे विमानप्रवासात अडचणी आल्याने तब्बल दोन तास उशिराने येथील तपोवन मैदानावर रखरखत्या उन्हात ही सभा झाली.महापुरात कोल्हापूर-सांगलीचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करून ही दोन्ही शहरे आम्ही सुंदर बनवू, असे आश्वासनही शहा यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायांखालची वाळू घसरल्यामुळेच ते विचित्र हावभाव करीत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेत केली.शहा म्हणाले,विकासाची कामे काय होतील-राहतील; पण काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत ५६ इंच छातीवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखविली. हे कलम रद्द झाल्यानंतरची देशातील ही पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीला विजयी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्या.कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. आमदार अमल महाडिक यांनी स्वागत केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाkolhapurकोल्हापूरBJPभाजपा