शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:07 IST

कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही.

ठळक मुद्देदुर्गम भागातील काही भागात नदीचा महापूर अद्याप ओसरला नाही. महापुराने जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. कोणत्याही शासकीय मदतीचा हात पोहचला नाही.

दिलीप चरणे / सुहास जाधव

नवे पारगाव / पेठ वडगाव - कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही. हे महापुरातील मदतीचे भीषण वास्तव आहे. प्राथमिक सुविधांचाही इथे बोजवारा उडाला आहे. 

दुर्गम भागातील काही भागात नदीचा महापूर अद्याप ओसरला नाही. महापुराने जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. कोणत्याही शासकीय मदतीचा हात पोहचला नाही. मदतीला धावणाऱ्या कोणत्याही स्वयंसेवी संघटना या खऱ्या दुर्गम पूरग्रस्तांना मदत करायला पुढे आलेल्या नाहीत.

जिल्ह्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यात 66 गावांच्या पैकी 40 गावे ही  पूरबाधित आहेत. या ठिकाणी कळे मदत केंद्रात फक्त एकच बोट उपलब्ध असून त्यालाही चालक नाही. त्यामुळे ती पडूनच आहे. या तालुक्यातील बाजार भोगाव, कळे,यवलुज, पडळ, कोतोली, कोलोली या ठिकाणी अद्याप कोणतीही ही मदत पोहोचलेली नाही.

शाहुवाडी तालुक्यातील दहा ते बारा गावांशी संपर्क नसून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू संपल्याने तेथील नागरिक हवालदील झाले आहेत. कांते, पारले, बरकी, मरळी पावरडी, सोंडोली, रेठरे, मानेवाडी, शित्तुर - वारूण, वारूळ, थेरगाव, वारणा कापशी, वाडीचरण येथील नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारचे मदत पोहोचलेली नाही.

आरोग्य सुविधाची ही वानवा झाली आहे. पंचवीस जुलैपासून कासारी नदीवरील पाल, बर्की बंधाऱ्यावर पाणी आल्याने पाल इजोली, सावर्डी, बर्की, मरळे, बुराणवाडी, कोटकरवाडी, दाभोळकरवाडी या गावांचा अद्यापही संपर्क तुटला आहे. तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी या बंधाऱ्यातील पाणी न उतरल्याने लोकांनी खायचे काय? असा प्रश्न पूरग्रस्त विचारत आहेत. घरातील सर्व धान्य, किराणा, औषधपाणी संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 

एका महिन्यापासून आरोग्याच्या कोणत्याच सुविधा नसल्याने अनेकजण आजारी आहेत .त्या गावांपर्यंत कोणतीही शासकीय मदत व सहकार्य मिळालेले नाही. या परिसरातील वीज पुरवठा एक महिन्यापासून खंडीत झाला आहे. महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्याची गरज आहे. वीज नसल्यामुळे सर्व दूरध्वनी सेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे कासारी खोऱ्यात प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.  या परिसरात दळणवळण व सर्व सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. गडहिंग्लज तालुक्‍यातील पूरबाधित हिटणी, निलजे, हेब्बाळ, धोंडगे, जरळी, भडगाव, कडलगे, नांगनूर या गावांना अजून कोणतंही साहाय्य मिळालेलं नाही.

हवालदिल पुरग्रस्तांचे आवाहन

दुर्गम भागातील पूरग्रस्त नागरिकांची महापुरामुळे घरे पडल्याने लोक बेघर झाले आहेत. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ व्हावेत. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा मदत करण्याची हाक पूरग्रस्त नागरिकांतून दिली जात आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरSatara Floodसातारा पूर