शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

आमचं काय चुकलं, जनतेनं सांगावं; चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूरकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:32 IST

चंद्रकांत पाटलांनी भाजपा मुक्त कोल्हापूरचे खापर शिवसेनेवर फोडले.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमधील जनतेलाच प्रश्न विचारले आहेत.

कोल्हापूरात आम्ही चांगली कामे केली आहेत. कोल्हापूरात विमानसेवा आम्ही सुरु केली. ज्यांनी दहा वर्षे विमानसेवा बंद ठेवली, त्यांनाच तुम्ही विजयी केला. ज्यांनी कोल्हापूर बकाल केले, त्यांना तुम्ही निवडून दिले, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील जनतेला केले आहेत. 

याशिवाय, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर फोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आधीपासूनच भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी आपल्याला खासदार केले आहे, त्यांचे मला ऋण भेडायचे आहे, असे उघडपणे जाहीर करत काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, मंडलिकांनी याला पाड त्याला पाड या आपल्या मूळ संस्काराप्रमाणे राजकारण केले. ते आपल्या सोयीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मूळ शिवसैनिकांनी या मंडलिक प्रवृत्तीचा विचार करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने चांगली मुसंडी मारली होती. मात्र, या निवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो, याबाबत चिंतन करणार आहोत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. परंतू आमचे काय चुकले, ते जनतेने सुद्धा सांगावे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना केला आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूरBJPभाजपा