शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही म्हणून ही रडारड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 08:39 IST

Aditya Thackeray Criticize Eknath Shinde: ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भावूक भाषण केले होते.  मी एक बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो, असे ते म्हणाले होते. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भावूक भाषणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळेच ही सगळी रडारड चालली आहे. खोटं बोलायचं हे त्यांचं धोरण आहे. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांना मंत्रिपद दिलं,  सगळं काही दिलं. त्यांच्याच पाठीत जो माणून खंजीर खुपसू शकतो, ते किती काळ्या मनाचे आहेत आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 

दरम्यान, मुंबईत झालेल्या सभेमधूनही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली होती. ते म्हणाले की, 'गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली आहे. पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर हा टॅग कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये  पळवले जाताहेत. मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला झाली. जर तो सामना मुंबईत झाली असती तर वेगळा निकाल लागला असता, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.  

यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरही आधित्य ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, आज या गद्दारांविरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर तुरुंगात जाऊन आले आहेत, आता तर ते कोणाला घाबरत नाही आहेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरीसुद्धा  ईडी, सीबीआय घेऊन येतील, पण आपण घाबरायच नाही. आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायचं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना