शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

Maharashtra Bandh : कोल्हापूर : अनियंत्रित गर्दीला कौशल्याने हाताळले, हुशारीने आखली नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:48 IST

 मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ यशस्वी झाल्यानंतर घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते , अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.

ठळक मुद्देअनियंत्रित गर्दीला कौशल्याने हाताळलेहुशारीने आखली नीती

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ यशस्वी झाल्यानंतर घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते , अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.

गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले होते. त्यानुसार अनेकांनी बंद आणि दसरा चौकात होणाऱ्या सभेस उपस्थित राहण्याची तयारी केली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून समाजाचे जथ्ये दसरा चौकाकडे जात होते.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे जमावाच्या झुंडीच्या झुंडी शहराच्या विविध भागांत रॅली काढण्यात मश्गूल झाल्या.

गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते आणि जमाव कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे सभेतील भाषणे झाल्यानंतर जमावाला शांतपणे घरी घालविणे एक आव्हान होते.

घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.

‘जय भवानी, जय शिवाजी, मर्द मराठा’ अशा गाण्यांच्या तालावर उपस्थित जमाव नृत्य करायला लागला. ज्यांना नृत्य करायचे होते ते दसरा चौकात थांबून राहिले. ज्यांना त्यात रस नव्हता त्यांनी माघारी फिरणे पसंत केले. ही नीती आखल्यामुळे जमाव एकाच वेळी दसरा चौकातून न जाता तो हळूहळू निघून गेला. शांततेत माघारी फिरला.

छत्तीस तासांहून अधिक काळ ‘कोल्हापूर बंद’

कोल्हापूर शहर व परिसराने यापूर्वी अनेक वेळा विविध कारणांनी ‘कोल्हापूर बंद’ पाहिला. बंदमध्ये सहभाग घेतला; परंतु गुरुवारसारखा बंद बऱ्याच वर्षांनी पाहिला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोल्हापुरातील इतर ‘बंद’च्या काळात सर्वसाधारणपणे दुपारी चार वाजेपर्यंत व्यवहार बंद राहायचे आणि त्यानंतर व्यवहार सुरळीत व्हायचे.

मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्रीपासूनच सर्व व्यवहार बंद झाले. गुरुवारी दिवसभरात कोणीही दुकानांची शटर्स उघडली नाहीत. शुक्रवारी सकाळी नऊनंतरच दुकाने उघडली जातील. त्यामुळे ३६ तासांचा हा ‘बंद’ पाळला गेला. १९९३ मध्ये अंबाबाई मंदिरात सुतळी बाँम्ब फुटल्यानंतर कोल्हापुरात सलग तीन दिवस शहरात कर्फ्यू लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी एवढा मोठा ‘बंद’ पाहायला मिळाला.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर