शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

Vidhan Sabha Election 2024: शिरोळमध्ये काटाजोड सामना; यड्रावकर, गणपतराव, उल्हास पाटील यांचा कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:53 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : शिरोळ मतदारसंघात माघारीनंतर दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुतीचे ...

संदीप बावचेजयसिंगपूर : शिरोळ मतदारसंघात माघारीनंतर दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुतीचे राजेंद्र पाटील- यड्रावकर, महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांच्यात सरळ लढत होईल, असे चित्र असतानाच बंडखोरी करीत उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीत प्रवेश करून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मत विभागणीचा फायदा कोणाला होणार, यावरच गणिते अवलंबून राहणार आहेत.यड्रावकर यांनी महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी घटक पक्षांची भूमिका होती. दलित, मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी यड्रावकर यांनी सुरुवातीपासूनच अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांची रणनीती यशस्वी ठरली. विकासकामांच्या शिदोरीवर यड्रावकर हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतांचे गणित कसे यशस्वी ठरते त्यावरच त्यांच्या विजयाची गणिते अबलंबून आहेत.महाविकास आघाडीतून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्व. सा.रे. पाटील यांच्या कामाची पोचपावती मतदार कशी देतात, यावरच निवडणुकीतील यशाचे गणित अवलंबून असणार आहे. २०१४ ला स्वाभिमानीने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून उल्हास पाटील आमदार झाले. २०१९ ला त्यांचा पराभव झाला. उद्धवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने स्वाभिमानीतून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.प्रमुख तिरंगी लढत होत असली तरी बहुजन समाज पार्टीकडून दादासो मोहिते, रिपब्लिकन सेनेचे विश्वजित कांबळे, अपक्ष गजाला मुल्ला, जितेंद्र ठोंबरे, राहुल कांबळे, शीला हेगडे, शंकर बिराजदार आदी उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विकासकामांचा मुद्दा अधिक प्रभावीराजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी विकास हाच मुद्दा घेऊन प्रचाराचा रोख ठेवला आहे, तर गणपतराव पाटील यांनी सततचा भेडसावणारा महापूर, बेरोजगारी, पंचगंगा प्रदूषण प्राधान्याने सोडविण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. तालुक्यातील प्रश्न चळवळीमुळेच सुटू शकतात, हा मुद्दा घेऊन उल्हास पाटील मैदानात उतरले आहेत.गड कोण जिंकणारशिरोळसह जयसिंगपूर व कुरुंदवाड या तीन शहरांतील मते निर्णायक ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाची, तर महाविकास आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. स्वाभिमानीचे होम पिच असतानाही त्यांच्या मताधिक्यात घट झाली होती. महायुतीतून यड्रावकर यांना गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे, रामचंद्र डांगे, विजय भोजे,

महाविकास आघाडीतून गणपतराव पाटील यांना वैभव उगळे, मधुकर पाटील, चंगेजखान पठाण, तर उल्हास पाटील यांच्या पाठीशी माजी खासदार राजू शेट्टी यांची ताकद आहे. मत विभागणीचा फायदा कोणाला मिळणार, शिरोळचा गड कोण जिंकणार याचीच उत्सुकता आहे.

  • एकूण मतदार - ३,२९,१४१
  • पुरुष - १,६३,२५४
  • महिला - १,६५,८८५
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirol-acशिरोळMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024