शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

'बटेंगे तो कटेंगे' ला काँग्रेसचे 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर - सुप्रिया श्रीनेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:21 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही

कोल्हापूर : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. हे राज्य जोडणारे आहे. त्यामुळे भाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांच्या या नाऱ्याला आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर देऊ, या शब्दांत काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी भाजपचा समाचार घेतला.संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रच पहिल्यांदा धावून आला असून पुढेही महाराष्ट्रच त्याचे रक्षण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा डीएनए असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

फडणवीस यांनी माफी मागितली नाहीविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या श्रीनेत यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत पत्रकारांशी संवाद साधला. श्रीनेत म्हणाल्या, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान यासारखे विषय मुद्दामहून आणत आहे. महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नसलेले प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, येथील जनता सजग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधानांनी ढोंगीपणा आणत माफी मागितली. देवेंद्र फडणवीस यांनी तर तीही मागितली नाही.

उद्योगांना कर्जमाफी पण शेतकऱ्यांची नाहीभाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' हा नारा घेऊन पुढे जात आहोत. सोयाबीन, कांदा यांचे भाव कोसळले आहेत. महाराष्ट्रात रोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ लाख कोटींची उद्योगांना कर्जमाफी दिली, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. हे सरकार कुणासाठी चालवले जात आहे, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला.शहांना चर्चेचे खुले आव्हानइडी, सीबीआयला घाबरून काहीजण पक्षातून पळून गेले. मात्र, अशा वातावरणातही सतेज पाटील यांच्यासारखे शेर पक्षात राहून काम करत आहेत, असे सांगत श्रीनेत म्हणाल्या, अमित शहा यांनी नोकरी, रोजगार, महागाई, कारभार, महाराष्ट्र, अस्मिता, कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पाच मिनिट सतेज पाटील यांच्याशी चर्चा करावी. त्यांचा गळा सुकेल पण ते चर्चा करू शकणार नाहीत, कारण ते मुद्द्यांवर चर्चा करू शकत नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024