शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

उसाच्या बिलाऐवजी सभासदांना चक्क साखरेचे वाटप

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

‘उत्तर प्रदेश’मध्ये फॉर्म्युला : कारखाने आणि शेतकऱ्यांचीही अगतिकता

विश्वास पाटील - कोल्हापूर -ऊस उत्पादकांची बिले देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने उत्तरप्रदेशातील बिंजोर येथील साखर कारखान्याने वेगळाच मार्ग निवडला आहे. कारखान्याने बिलाऐवजी साखरेचेच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पैशाची व्यवस्था होईपर्यंत कारखान्याने दोन क्विंटल साखर ऊस उत्पादकांना सहा हजार रुपयांस देण्याचे ठरविले आहे. साखर कारखानदारीतील या फॉर्मुल्याची चर्चा सुरू झाली आहे; परंतु त्यातून यंदाच्या हंगामातील कारखानदारी व शेतकऱ्यांचीही अगतिकता स्पष्ट होत आहे.बरकतपुरा येथील ‘उत्तम शुगर मिल’ने सुरू केलेली ही योजना बिंजोर येथील थकित ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादकाना काहीशी आश्वासक वाटत आहे. सध्या बाजारात साखरेला खूपच कमी मागणी आहे. यामुळे कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. बँकांही अर्थसहाय्य देण्यास नकार देत आहेत त्यामुळे कारखाने ऊस बिले भागवू शकत नाहीत. परंतू पैसे नसले तरी किमान साखर तरी द्यावी या भावनेतून या कारखान्यांने हा मार्ग निवडला आहे. ज्यांना ही योजना स्वीकारार्ह आहे ते कधीही कारखान्यावरून साखर उचलू शकतात. त्यांच्या थकित बिलातून ही रक्कम वळती करण्यात येईल. सध्या दोन क्विंटल साखरेची बाजारातील किंमत ६००० इतकी आहे. पण ऊस उत्पादकांसाठी हा भाव दोन क्विंटल साठी रुपये ५६०० इतका असेल. या योजनेमुळे उत्पादकांना फायदा होईल असे संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनास वाटते. या निर्णयामुळे कारखान्यास शेतकऱ्यांच्या अडचणींची निदान कांही तरी जाणीव आहे अशा प्रतिक्रिया सभासदांतून व्यक्त होत आहेत. उत्तरप्रदेशातील अनेक कारखान्यांनी ३१ आॅक्टोबर पासून कारखान्यांना बिलेच दिलेली नाहीत. त्यांना या निर्णयामुळे थोडा तरी दिलासा मिळू शकेल. या योजनेचा सुमारे २५० ऊस उत्पादकांनी लाभ घेतला आहे.महाराष्ट्रात काय...?हा फॉर्मुला महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता नाही. कारण येथील साखर कारखानदारी एका सभासदाला वर्षाला ६० ते ७५ किलोपर्यंतची साखर देते. एका कुटुंबात किमान दोन-तीन तरी सभासद असतात. त्यामुळे तीच साखर त्यांना जास्त होते. बिगर सभासदांनाही टनास अर्धा वा एक किलो साखर दिली जाते. त्यामुळे ऊसबिलाऐवजी साखर घेऊन त्याचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित होऊ शकतो. बाजारातील साखरेचे दर घसरले. त्यामुळे एफआरपी देणेही शक्य नाही. त्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीची गरज होती; परंतु भाजप सरकारला कारखानदारीबद्दल फारशी आस्था नाही. त्यामुळे ही कारखानदारी कोंडीत सापडली आहे.