शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

उसाच्या बिलाऐवजी सभासदांना चक्क साखरेचे वाटप

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

‘उत्तर प्रदेश’मध्ये फॉर्म्युला : कारखाने आणि शेतकऱ्यांचीही अगतिकता

विश्वास पाटील - कोल्हापूर -ऊस उत्पादकांची बिले देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने उत्तरप्रदेशातील बिंजोर येथील साखर कारखान्याने वेगळाच मार्ग निवडला आहे. कारखान्याने बिलाऐवजी साखरेचेच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पैशाची व्यवस्था होईपर्यंत कारखान्याने दोन क्विंटल साखर ऊस उत्पादकांना सहा हजार रुपयांस देण्याचे ठरविले आहे. साखर कारखानदारीतील या फॉर्मुल्याची चर्चा सुरू झाली आहे; परंतु त्यातून यंदाच्या हंगामातील कारखानदारी व शेतकऱ्यांचीही अगतिकता स्पष्ट होत आहे.बरकतपुरा येथील ‘उत्तम शुगर मिल’ने सुरू केलेली ही योजना बिंजोर येथील थकित ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादकाना काहीशी आश्वासक वाटत आहे. सध्या बाजारात साखरेला खूपच कमी मागणी आहे. यामुळे कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. बँकांही अर्थसहाय्य देण्यास नकार देत आहेत त्यामुळे कारखाने ऊस बिले भागवू शकत नाहीत. परंतू पैसे नसले तरी किमान साखर तरी द्यावी या भावनेतून या कारखान्यांने हा मार्ग निवडला आहे. ज्यांना ही योजना स्वीकारार्ह आहे ते कधीही कारखान्यावरून साखर उचलू शकतात. त्यांच्या थकित बिलातून ही रक्कम वळती करण्यात येईल. सध्या दोन क्विंटल साखरेची बाजारातील किंमत ६००० इतकी आहे. पण ऊस उत्पादकांसाठी हा भाव दोन क्विंटल साठी रुपये ५६०० इतका असेल. या योजनेमुळे उत्पादकांना फायदा होईल असे संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनास वाटते. या निर्णयामुळे कारखान्यास शेतकऱ्यांच्या अडचणींची निदान कांही तरी जाणीव आहे अशा प्रतिक्रिया सभासदांतून व्यक्त होत आहेत. उत्तरप्रदेशातील अनेक कारखान्यांनी ३१ आॅक्टोबर पासून कारखान्यांना बिलेच दिलेली नाहीत. त्यांना या निर्णयामुळे थोडा तरी दिलासा मिळू शकेल. या योजनेचा सुमारे २५० ऊस उत्पादकांनी लाभ घेतला आहे.महाराष्ट्रात काय...?हा फॉर्मुला महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता नाही. कारण येथील साखर कारखानदारी एका सभासदाला वर्षाला ६० ते ७५ किलोपर्यंतची साखर देते. एका कुटुंबात किमान दोन-तीन तरी सभासद असतात. त्यामुळे तीच साखर त्यांना जास्त होते. बिगर सभासदांनाही टनास अर्धा वा एक किलो साखर दिली जाते. त्यामुळे ऊसबिलाऐवजी साखर घेऊन त्याचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित होऊ शकतो. बाजारातील साखरेचे दर घसरले. त्यामुळे एफआरपी देणेही शक्य नाही. त्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीची गरज होती; परंतु भाजप सरकारला कारखानदारीबद्दल फारशी आस्था नाही. त्यामुळे ही कारखानदारी कोंडीत सापडली आहे.