शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले योजनेत खासगी दवाखान्यांची लूटमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने मोठमोठ्या घोषणा करत महात्मा फुले योजनेतून सर्व कोरोना रुग्णांवर ...

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने मोठमोठ्या घोषणा करत महात्मा फुले योजनेतून सर्व कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची घोषणा केली खरी; परंतु, खासगी रुग्णालयात आल्यानंतर अनेक ठिकाणी ‘आमच्या रुग्णावर फुले योजनेतून उपचार नकोत, आम्ही जे होईल ते बिल अदा करू’ असे लेखी घेतले जात असल्याने नातेवाइकांची कोंडी झाली आहे. एकीकडे रुग्णाची गंभीर स्थिती असताना दुसरीकडे असे लिहून देण्याखेरीज हातात काहीच नाही, अशा कात्रीत रुग्णांचे नातेवाईक अडकलेले आहेत.

राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून पांढऱ्या, केशरी आणि पिवळ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना कोरोनाचे उपचार करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी हजारो कुटुंबांना याचा फायदा झाला. परंतु, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी हात धुऊन घ्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही. रुग्ण तर धापा टाकत असतो. अशा परिस्थितीमध्ये काहीही करा; परंतु, आमच्या पेशंटला दाखल करून घ्या, असे नातेवाईक अजीजीने सांगत असतात. याचवेळी मग त्यांच्याकडून अशा पद्धतीने आम्हाला महात्मा फुले योजनेतून उपचार नको, असे लिहून घेतले जाते. त्यानंतरच रुग्णाला दाखल करून घेतले जात आहे.

आठ दिवसाला एक लाख, दहा दिवसाला सव्वा लाख, रेमडेसिविरचे वेगळे अशा पद्धतीची पॅकेजेस रुग्णालयांनी काढली असून, यामध्ये अनेक ठिकाणी महात्मा फुले योजना वाऱ्यावरच सोडली आहे. सध्याच्या परिस्थितीत याची छाननी म्हणावी तेवढ्या प्रभावीपणे होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची आयुष्यभराची कमाई संपून उर्वरित बिल भागवण्यासाठी गोळा बेरीज करावी लागत आहे.

चौकट

यंदा उपचार करणाऱ्या रुग्णालयात वाढ

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा अनेक डॉक्टरांनी रुग्णालये बंद करण्यावर भर दिला होता. संपूर्ण जिल्ह्यात केवळ ४० रुग्णालये गेल्या वर्षी कोरोना रुग्णांवर उपचार करत होती. मात्र, या उपचारांचे महत्त्व लक्षात आल्यामुळे यंदा १५० हून अधिक रुग्णालयांनी कोरोनावरील उपचार सुरू केले आहेत. त्यांनी उपचार करणे दिलासादायक असले तरी बिलाची रक्कम पाहून मात्र नातेवाइकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. सर्वच रुग्णालये अशा पद्धतीने करत नसली तरी, असे करणाऱ्या रुग्णालयांची संख्या मोठी आहे.

चौकट

तक्रार करणार कोण?

आपला नातेवाईक दवाखान्यात असताना लाखो रुपये भरून घेणाऱ्या रुग्णालयांविरोधात तक्रार करणार कोण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत प्रशासन कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.