शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नाती हरवताहेत... दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:29 IST

जगभर पितृदिन साजरा होत असतानाच रविवारी एक बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मालमत्ता नावावर करीत नाहीत म्हणून एका मुलाने आपली आई आणि वडिलांना नारळपाण्यातून विष दिल्याची ती बातमी होती. यात

- चंद्रकांत कित्तुरे-

जगभर पितृदिन साजरा होत असतानाच रविवारी एक बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मालमत्ता नावावर करीत नाहीत म्हणून एका मुलाने आपली आई आणि वडिलांना नारळपाण्यातून विष दिल्याची ती बातमी होती. यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आईने प्रसंगावधान राखल्याने तिचा जीव वाचला. ज्याला जन्म दिला, हाडाची काडं करून वाढविला, शिकविला, संसाराला लावला त्यानंच आई-बापाच्या जिवावर उठावं याला काय म्हणावं ? श्रावणबाळाचा वारसा सांगणारा आपला देश, संस्कृती; जिथे नातेसंबंधांना खूप महत्त्व दिलं जातं. मुळात नातेसंबंध म्हणजे काय? रक्ताची नाती म्हणजे पै-पाहुणे, भावकी, आदी नातेवाईक मंडळी. यात काही दूरची तर काही जवळचीही नाती असतात. याशिवाय जोडलेली नातीही जीवनात फार महत्त्वाची असतात. बऱ्याचवेळा रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नातीच अधिक उपयोगी पडतात. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. आता ‘हम दो हमारे दो किंवा एक’चा जमाना आहे. यामुळे एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबपद्धतीला महत्त्व आले आहे. लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींना काही दिवसांतच सासू-सासरे, दीर, नणंद ही पतीच्या जवळची माणसे घरात नकोशी वाटू लागतात. यावरून घरात भांडणे सुरू होतात. वेगळं राहाण्याचा लकडा पतीच्या मागे लावला जातो. दररोजच्या कटकटीला कंटाळून पती विभक्त राहण्याचा निर्णय घेतो किंवा तुमचं तुम्ही वेगळं राहा, असं आई-वडीलच सांगून टाकतात. असं सांगताना त्या जन्मदात्यांना काय वेदना होत असतील, हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे. याचवेळी आपण सासरी जशा वागतो तसे आपल्या भावाच्या बायकोने आपल्या आई-वडिलांसोबत वागू नये, असेही या महिलांना वाटत असते. पण घरोघरी मातीच्याच चुली. या उक्तीप्रमाणे प्रत्येक घरात कमी अधिक फरकाने सारखीच परिस्थिती असते. यामुळेच आजकाल एकत्र कुटुंबे शोधावी लागतात. वृद्धाश्रमांची वाढती संख्या देखील हेच दर्शविते. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे बºयाचवेळा त्यांची विचारपूस करायलाही येत नाहीत. यामुळे वारसदार असूनही बेवारसाची जिंदगी वाट्याला आल्यासारखे त्यांना जगावे लागते. मृत्यूनंतर मृतदेह ताब्यात घ्यायला न येता तुम्हीच अंत्यविधी उरकून घ्या, असे वृद्धाश्रमचालकांना सांगणारे काही महाभागही असल्याचे वृद्धाश्रमचालकांशी चर्चा करताना जाणवते. एकलकोंडेपणाचे जीवन वाट्याला आलेले हे माता-पिता कधीतरी माझे बाळ येईल आणि मला आपल्या घराकडे घेऊन जाईल, या आशेवर कसेतरी दिवस ढकलत असते.‘मातृ देवो भव! पितृ देवो भव!’ असे म्हणणारा भारतीय समाज तो हाच का, असा प्रश्न हे पाहून पडतो. वाढती महागाई, बदलती जीवनशैली, पाश्चात्यांचे अंधानुकरण, वाढती महत्त्वाकांक्षा यासारख्या कारणामुळे समाज असा बदलत चालला आहे. यामुळेच नात्यातील मायेचा, प्रेमाचा ओलावा कमी होत चालला आहे. याला अपवाद असणारी मुले-मुली, आई-वडील, कुटुंबे आहेत; नाही असे नाही, पण त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे दिसते. कोणतंही नातं विश्वासावर अवलंबून असतं; टिकून असतं. पण आजच्या स्वार्थी जमान्यात हा विश्वासही हरवू लागला आहे. यामुळेच की काय माणूस नातीही विसरू लागला आहे की काय, असे वाटण्याजोग्या बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. पती-पत्नी, भाऊ- बहीण, बाप-लेक, दीर-भावजय, यासारख्या नात्यांचं पावित्र्यही राखलं जाताना दिसत नाही, असे वाटते. जनावरेसुद्धा निसर्गनियम पाळतात. मात्र माणसे तो मोडतात, आणि अनिर्बंध जगू लागतात. त्यावेळी ती हैवान बनतात. अशा हैवानांना शासन करून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच टाकायला हवा. त्याचवेळी रक्ताची असोत वा जोडलेली नाती, टिकविली पाहिजेत; जपली पाहिजेत.वृद्ध माता- पित्यांच्या बाबतीत तर आपण अधिक जागरुक रहायला हवे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते, असे म्हणतात. याची जाणीव ठेऊन त्यांना जपायला हवे. त्यांची काळजी घ्यायला हवी, त्याचवेळी ‘मातृ देवो भव! पितृ देवो भव!’ या उक्तीला आपण जागलो असे म्हणता येईल.

(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.-kollokmatpratisad@gmail.com)