शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : पुरोगामी कोल्हापूरचे चित्र, ७० वर्षांत चार आमदार; दोनच महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 10:39 IST

राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणारा कोल्हापूर जिल्हा महिलांना राजकीय स्थान देण्यात मात्र खूपच मागे असल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत कशाबशा चार आमदार व दोनच महिला खासदारांना निवडून दिले आहे. ज्या निवडून आल्या आहेत, त्यादेखील प्रस्थापित राजकीय घराण्यांतीलच आहेत. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत महिलांचे मतदान निम्मे आहे; परंतु विधानसभा व लोकसभेला मात्र महिलांना पुरेशा प्रमाणात संधी मिळाली नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्दे७० वर्षांत चार आमदार; दोनच महिला खासदार पक्षांकडून उमेदवारी देतानाच हात आखडता

विश्र्वास पाटील कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणारा कोल्हापूर जिल्हा महिलांना राजकीय स्थान देण्यात मात्र खूपच मागे असल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत कशाबशा चार आमदार व दोनच महिला खासदारांना निवडून दिले आहे. ज्या निवडून आल्या आहेत, त्यादेखील प्रस्थापित राजकीय घराण्यांतीलच आहेत. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत महिलांचे मतदान निम्मे आहे; परंतु विधानसभा व लोकसभेला मात्र महिलांना पुरेशा प्रमाणात संधी मिळाली नसल्याचे वास्तव आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र असते. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रात लोकसंपर्क, संघटनात्मक बळ आणि आर्थिक ताकद यांचा विचार उमेदवारी देताना कायमच होतो. त्यामुळेच ही निवडणूक लढवून उत्तम काम करून दाखवू शकतील, अशा महिला असतानाही त्यांना संधी मात्र मिळाल्याचे दिसत नाही.

पहिल्या महिला खासदार म्हणून विजयमाला राणीसाहेब छत्रपती यांना १९६७ ला लोकांनी निवडून दिले. त्यांच्याविरोधात मेजर जनरल एसपीपी थोरात काँग्रेसकडून रिंगणात होते; परंतु त्यावेळी जिल्ह्यात दत्तक प्रकरण गाजले होते व त्या चळवळीच्या प्रतीक म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.

थोरात यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या; परंतु कोल्हापूरने थोरात यांचा पराभव केला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापूर मतदारसंघात आजअखेर एकही महिला खासदार झालेली नाही. ज्या दोन्ही महिला खासदार झाल्या, त्या पूर्वीच्या इचलकरंजी व आताच्या हातकणंगले मतदारसंघातून.

श्रीमती निवेदिता माने यांनाही माने घराण्याचा राजकीय वारसा होता. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले होते; त्यामुळे महिला म्हणून नव्हे तर त्या घराण्याच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांना ही संधी मिळाली. विधानसभेला विमलाबाई बागल यांचा अपवाद वगळता अन्य तीन महिला आमदारांच्या बाबतीत घराण्यातील सत्ता पुढे चालू राहावी यासाठीच महिलांना ही संधी दिल्याचे चित्र दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिलांना संधी मिळत आहे; परंतु त्यासाठी आरक्षण कारणीभूत आहे. आरक्षण नव्हते तेव्हा त्या स्तरांवरही फारशी समाधानकारक स्थिती नव्हती.

 

सरंजामी वृत्ती आणि पुरुषसत्ताक मानसिकता अजूनही घट्ट असल्याने महिलांना राजकारणात पुरेशी संधी मिळत नाही. ही स्थिती कोल्हापुरातच नव्हे तर देशातही आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने रुजली नाही याचेच हे द्योतक आहे. एकाच कुटुंबात मुलगा आणि मुलगी सक्षम असली तरी संधी मुलालाच मिळते, हे वास्तव आजही आहे.- डॉ. माया पंडितडाव्या चळवळीतील कार्यकर्त्या

आतापर्यंतच्या खासदार

  • इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ : विजयमाला राणीसाहेब छत्रपती (१९६७-शेकाप)
  • हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : श्रीमती निवेदिता माने (१९९९, २००४ राष्ट्रवादी) 

यांनीही लढवली लोकसभा निवडणूक :

  • कोल्हापूर मतदारसंघ - सुनंदा मोरे (शेकाप-२००४),
  • डॉ. निलांबरी रमेश मंडपे (अपक्ष-२००९)
  • हातकणंगले मतदार संघ - डॉ. माया पंडित (माकप- १९९८),
  • सुनीता अरविंद माने (अपक्ष-२००४) 

आतापर्यंतच्या आमदार

  • कागल मतदारसंघ : विमलाबाई बागल (१९५७-शेकाप)
  • शिरोळ मतदारसंघ : सरोजिनी खंजिरे (१९८५-काँग्रेस)
  • शाहूवाडी मतदारसंघ : संजीवनी गायकवाड (१९९८-काँग्रेस)

  • चंदगड मतदारसंघ : संध्यादेवी कुपेकर (२०१४-राष्ट्रवादी) 

यांनीही लढवली विधानसभा निवडणूक 

  • राधानगरी-भुदरगड : श्रीमती तारामती कडव (१९८५- काँग्रेस)
  • कोल्हापूर शहर : श्रीमती शिवानी देसाई (१९९५-काँग्रेस)
  • शिरोळ : श्रीमती रजनी मगदूम (२००४-काँग्रेस)
  •  
  • कोल्हापूर मतदारसंघ स्त्री-मतदार : ९ लाख १३ हजार ४३३
  • हातकणंगले मतदारसंघ स्त्री-मतदार : ८ लाख ५३ हजार ५९६

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिलाPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर