शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

..त्यानंतर 'इंडिया'ला निर्णय घेण्यास भाग पाडू - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:31 IST

कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात प्रागतिक पक्ष व संघटनांची बैठक

कोल्हापूर : इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी मला वारंवार विचारणा केली जात आहे. मी याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. पहिल्यांदा आपली ताकद दाखवू. त्यानंतर त्यांनाच निर्णय घेण्यास भाग पाडूया, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित प्रागतिक पक्ष व संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, यापूर्वीचा आमचा अनुभव चांगला नाही. सत्तेत आल्यानंतर आम्हाला न विचारता अनेक निर्णय घेतले जातात. महत्त्वाचा कायदा करण्यासंदर्भात आम्हाला विचारले जात नाही.पवार-पाटील यांनी माझ्या शारीरिक अडचणीमुळे मी फक्त नावापुरते काम करू शकतो. त्यामुळे माझ्याऐवजी मंचचे दुसऱ्याला निमंत्रक म्हणून नेमण्यात यावे, असे सांगितले. याला सर्व कार्यकर्त्यांनी विरोध दाखवला. यामुळे पवार-पाटील हेच कोल्हापूर विभागाचे निमंत्रक असल्याचा ठराव करण्यात आला.यावेळी उदय नारकर यांनी प्रास्ताविक केले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते प्रताप होगाडे यांनी प्रागतिक मंच आघाडीची भूमिका स्पष्ट केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ए. बी. पाटील, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष सावंत यांची भाषणे झाली. बैठकीस बाबुराव कदम, रघुनाथ कांबळे, रामचंद्र कांबळे, सुरेश दगडे, वसंतराव पाटील, रवी जाधव, वैभव कांबळे, केरबा पाटील, डी. के. कांबळे यांच्यासह प्रागतिक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी