शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Rain: कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली; विशाळगडावर दगडी बुरुज कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:46 IST

पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळत राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज, गुरुवारी सकाळपासून पावसाची जोर कमी असला तरी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट २ इंचावर पोहचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ‘वारणा’ व ‘राधानगरी’ धरणातून विसर्ग वाढल्याने तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.यातच शाहुवाडी तालुक्यातील विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे याठिकाणाहून वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र, पर्यायी मार्गाने लोक गडावर येत जात आहेत.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड या तालुक्यात पाऊस जोरदार कोसळत आहे. दिवसभर एकसारखा पाऊस राहिल्याने नद्यांचे पाणी परिसरात विस्तीर्ण पसरले आहे. यामुळे ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच त्याचबरोबर ५ प्रमुख जिल्हा मार्ग व १३ ग्रामीण मार्ग असे १८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एस. टी. चे रंकाळा ते चौके, चंदगड ते इब्राहिमपूर व गगनबावडा ते धुंदवडे हे तीन मार्ग पूर्णपणे बंद राहिले आहेत.

गतवर्षीपेक्षा धरणात जादा साठा

राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा २.४१ टीएमसी, वारणा धरणात १.३२ टीएमसी तर दूधगंगा धरणात २.५७ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिला तर धरणे लवकर भरण्यास वेळ लागणार नाही.

राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्गराधानगरी धरणात १४४.५६ दलघमी पाणीसाठा आहे. आज, गुरुवारी सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आजपासून दूध संकलनावर परिणाम होणारकाल, बुधवारी जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दुधाची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. मात्र पाऊस असाच सुरू झाला तर आज, गुरुवारपासून दूध संकलनावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

पडझडीत १७.३४ लाखाचे नुकसान

पावसाचा जोर वाढत जाईल तसे पडझडीचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोन सार्वजनिक तर २९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १७ लाख ३४ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अलमट्टीतून विसर्ग वाढवला...कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने ‘वारणा’, ‘पचगंगा’सह ‘कृष्णा’च्या पाण्याची फुगी वाढत आहे. महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवला आहे. बुधवारी प्रतिसेकंद १ लाख ४ हजार ३०५ घनफूट पाण्याची आवक होते तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातील   पाणीसाठा   टीएमसीराधानगरी      २.४३         ४.८४तुळशी         १.७५         १.९८वारणा         १९.२१       २०.५३दूधगंगा        ९.७४         १२.३१कासारी        १.०५         १.८८कडवी         १.१४         १.५४कुंभी          १.३६         १.५९पाटगाव       १.७४         २.१२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी