शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

Rain: कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली; विशाळगडावर दगडी बुरुज कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:46 IST

पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळत राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज, गुरुवारी सकाळपासून पावसाची जोर कमी असला तरी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट २ इंचावर पोहचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर असल्याने आता केवळ दोन फुटाचाच फरक राहिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ‘वारणा’ व ‘राधानगरी’ धरणातून विसर्ग वाढल्याने तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.यातच शाहुवाडी तालुक्यातील विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे याठिकाणाहून वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र, पर्यायी मार्गाने लोक गडावर येत जात आहेत.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड या तालुक्यात पाऊस जोरदार कोसळत आहे. दिवसभर एकसारखा पाऊस राहिल्याने नद्यांचे पाणी परिसरात विस्तीर्ण पसरले आहे. यामुळे ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच त्याचबरोबर ५ प्रमुख जिल्हा मार्ग व १३ ग्रामीण मार्ग असे १८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एस. टी. चे रंकाळा ते चौके, चंदगड ते इब्राहिमपूर व गगनबावडा ते धुंदवडे हे तीन मार्ग पूर्णपणे बंद राहिले आहेत.

गतवर्षीपेक्षा धरणात जादा साठा

राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा २.४१ टीएमसी, वारणा धरणात १.३२ टीएमसी तर दूधगंगा धरणात २.५७ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिला तर धरणे लवकर भरण्यास वेळ लागणार नाही.

राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्गराधानगरी धरणात १४४.५६ दलघमी पाणीसाठा आहे. आज, गुरुवारी सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आजपासून दूध संकलनावर परिणाम होणारकाल, बुधवारी जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दुधाची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. मात्र पाऊस असाच सुरू झाला तर आज, गुरुवारपासून दूध संकलनावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

पडझडीत १७.३४ लाखाचे नुकसान

पावसाचा जोर वाढत जाईल तसे पडझडीचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोन सार्वजनिक तर २९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १७ लाख ३४ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अलमट्टीतून विसर्ग वाढवला...कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने ‘वारणा’, ‘पचगंगा’सह ‘कृष्णा’च्या पाण्याची फुगी वाढत आहे. महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवला आहे. बुधवारी प्रतिसेकंद १ लाख ४ हजार ३०५ घनफूट पाण्याची आवक होते तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातील   पाणीसाठा   टीएमसीराधानगरी      २.४३         ४.८४तुळशी         १.७५         १.९८वारणा         १९.२१       २०.५३दूधगंगा        ९.७४         १२.३१कासारी        १.०५         १.८८कडवी         १.१४         १.५४कुंभी          १.३६         १.५९पाटगाव       १.७४         २.१२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी