शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

By समीर देशपांडे | Updated: March 1, 2023 14:40 IST

संजय राऊत यांचा आरोप, कणेरी मठावरील गायींच्या मृ़त्युची चौकशी करा

समीर देशपांडे

कोल्हापूर - विधीमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. हे मंडळ म्हणजे डुप्लिकेट चोर मंडळ आहे अशी घणाघाती टीका खासदार संजय राउत यांनी येथे केली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कणेरी मठावरील गायींच्या मृत्युच्या चौकशीचीही मागणी केली.    

राउत म्हणाले,  त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण  अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने दिली, लोकांची गर्जना काय  आहे. काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना.  ही गर्जना पोहचविण्यासाठी  महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसू आले आहे. लोकसभेबाबत आता आम्ही चर्चा करू.

सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली.  पण दुसरीकडे जो जाब विचारतो,  त्याला तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं अस षडयंत्र रचले जात आहे , पण जनता  २०२४ ला याचा सर्व हिशोब करेल.  कोविड काळात  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा  उत्तम पध्दतीने दिल्या गेल्या. इकबालसिंह  चहल यांनी हे स्वतः सांगितले आहे. कोविड संदर्भात गुन्हा दाखल करायचा असेल तर योगी  आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण अनेक प्रेतं गंगेतून वाहून  गेली.  या काळात  गुजरातमध्ये स्मशानभूमीत रांगा  लागल्या होत्या, त्यामुळे आरोप करणाऱ्यानी  सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा.  

पुण्यात कसबा निवडणुक  आपण हरतो आहोत हे जेव्हा भाजपला कळले तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. यंत्रणेचा  वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल. चिंचवड ची जागा कोण जिंकेल हे भाजपला सांगता येत नाही हा भाजपचा पराभव आहे. पालघर मधील साधूंचा मृत्यू आणि कणेरी मठावरील गाईंचा मृत्यू आम्ही समान मानतो. कणेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी  झाली पाहिजे.  आमचे आमदार आज विधिमंडळात गाईंना श्रद्धांजली वाहतील.

सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार

आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट  सोमयाने लाखो, करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत  विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे आणि न्यायालयात जाणार आहे असे राउत म्हणाले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMLAआमदार