शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

By समीर देशपांडे | Updated: March 1, 2023 14:40 IST

संजय राऊत यांचा आरोप, कणेरी मठावरील गायींच्या मृ़त्युची चौकशी करा

समीर देशपांडे

कोल्हापूर - विधीमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. हे मंडळ म्हणजे डुप्लिकेट चोर मंडळ आहे अशी घणाघाती टीका खासदार संजय राउत यांनी येथे केली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कणेरी मठावरील गायींच्या मृत्युच्या चौकशीचीही मागणी केली.    

राउत म्हणाले,  त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण  अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने दिली, लोकांची गर्जना काय  आहे. काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना.  ही गर्जना पोहचविण्यासाठी  महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसू आले आहे. लोकसभेबाबत आता आम्ही चर्चा करू.

सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली.  पण दुसरीकडे जो जाब विचारतो,  त्याला तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं अस षडयंत्र रचले जात आहे , पण जनता  २०२४ ला याचा सर्व हिशोब करेल.  कोविड काळात  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा  उत्तम पध्दतीने दिल्या गेल्या. इकबालसिंह  चहल यांनी हे स्वतः सांगितले आहे. कोविड संदर्भात गुन्हा दाखल करायचा असेल तर योगी  आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण अनेक प्रेतं गंगेतून वाहून  गेली.  या काळात  गुजरातमध्ये स्मशानभूमीत रांगा  लागल्या होत्या, त्यामुळे आरोप करणाऱ्यानी  सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा.  

पुण्यात कसबा निवडणुक  आपण हरतो आहोत हे जेव्हा भाजपला कळले तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. यंत्रणेचा  वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल. चिंचवड ची जागा कोण जिंकेल हे भाजपला सांगता येत नाही हा भाजपचा पराभव आहे. पालघर मधील साधूंचा मृत्यू आणि कणेरी मठावरील गाईंचा मृत्यू आम्ही समान मानतो. कणेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी  झाली पाहिजे.  आमचे आमदार आज विधिमंडळात गाईंना श्रद्धांजली वाहतील.

सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार

आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट  सोमयाने लाखो, करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत  विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे आणि न्यायालयात जाणार आहे असे राउत म्हणाले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMLAआमदार