शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजीत विकासकामे कमी; श्रेयवाद जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराच्या विकासात गेल्या दहा वर्षांत राजकीय कुरघोड्या सुरू झाल्याने शहराची प्रगती खुंटली ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहराच्या विकासात गेल्या दहा वर्षांत राजकीय कुरघोड्या सुरू झाल्याने शहराची प्रगती खुंटली आहे. एखादे विकासकाम झाले अथवा मंजुरी मिळाली की, त्यावर श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तुटून पडण्याची पद्धत आली आहे. त्याचबरोबर गरज पडल्यास मंजूर झालेल्या कामाला 'खो' घालण्यासही मागे-पुढे पाहिले जात नाही. अशा कुरघोड्यांच्या राजकारणाऐवजी शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दहा वर्षांपूर्वी शहरातील राजकारण एका प्रवाहानुसार वाहत होते. परिणामी शहराची झपाट्याने प्रगती झाली. शहरातील प्रमुख व्यवसाय वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तत्कालीन राजकीय नेत्यांनी चांगले प्रयत्न केले. तसेच विविध योजना, सवलती मिळाल्याने वस्त्रोद्योगाला चालना मिळाली. हातमागापासून सुरू झालेला वस्त्रोद्योग अत्याधुनिक यंत्रमागापर्यंत पोहचला आहे. त्याच्याशी संलग्न सर्वच व्यवसाय जोमाने वाढले.

परंतु गत दहा-पंधरा वर्षांत वाढलेली महागाई व त्याबरोबर निर्माण झालेली वस्त्रोद्योगातील मंदी या कारणांमुळे शहरातील वस्त्रोद्योगाची वाताहत झाली. त्यात अत्याधुनिक यंत्रमाग व साधे यंत्रमाग यातील तफावत सहजपणे दूर न होणारी असल्याने साध्या यंत्रमागधारकांचे अधिकच नुकसान झाले. शासनाने वस्त्रोद्योगासाठीच्या अनेक सवलती बंद केल्या अथवा कमी केल्या, या सर्वांचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावर तसेच शहराच्या प्रगतीवर होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालल्याचे चित्र आहे.

त्यातूनही एखादी योजना मंजूर झाल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे सर्व प्रमुख नेते पुढे येतात. मंजूर झालेल्या विकासकामासाठी आपण किती दिवसांपासून पाठपुरावा करतो, त्याच्या पत्रांसह माहिती देतात. काम होण्यासाठी सर्वच नेते आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे प्रयत्न करीत असतात. शहराच्या विकासासाठी नेत्यांचे ते कर्तव्यच आहे, याचा त्यांना विसर पडतो की काय, असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो.

चौकटी

महाविकास आघाडीतील कुरघोड्या

विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष अंतर्गत कुरघोड्या करून आमच्याच पक्षाच्या नेत्याने हे काम करण्यासाठी किती धडपड केली, याची टिप्पणी करत बसतात. याउलट त्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या सरकारने हे काम केले, असा संयुक्त दाखला देणे अपेक्षित आहे.

टीका करणारे हेच

एखादे विकासकाम प्रलंबित पडले अथवा ते झाले नाही, तर एकमेकांवर टीका करण्यासाठीही हेच नेते पुढे असतात. काम कसे झाले नाही, याचे दाखले देतात.

'खो' घालण्याचा प्रकार

शहरातील आरटीओ कार्यालय 'एमएच ५०' मंजूर झालेले राजकीय कुरघोड्यांमुळे बारगळले. आयजीएम रुग्णालयातील कर्मचा-यांच्या भरतीसह विविध प्रलंबित कामे राजकीय कुरघोड्यांमुळे प्रलंबित, त्याचबरोबर ब्रेक टेस्ट ट्रॅक, भुयारी गटार योजना अशी अनेक उदाहरणे आहेत. एखाद्याने चांगले काम केले, असे त्याला श्रेय मिळू नये, याची खबरदारी घेत त्याला पद्धतशीरपणे 'खो' घालण्याचा प्रकार केला जातो. ही बाब शहराच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि गंभीर आहे.