शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

VIDEO : 'कोवाड'ची बाजारपेठ चार दिवस पाण्यात!, 2 कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:08 IST

पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे.

- राम मगदूम 

गडहिंग्लज : कोवाड (ता.चंदगड) येथील संपूर्ण बाजारपेठ चार दिवसांपासून पाण्यात आहे. त्यामुळे सुमारे 2 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेकडो नागरिक ताम्रपर्णी नदीच्या महापूराने वेढलेल्या घरात अडकले आहेत.

ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेले 'कोवाड'गाव स्वामीकार रणजीत देसाई यांच्यामुळे सर्वत्र परिचित झाले. ताम्रपर्णी नदीच्या पलीकडे बेळगाव मार्गावरील किणी गावच्या हद्दीत आणि अलीकडे पश्चिम बाजूच्या निट्टूर मार्गावर काही व्यापाऱ्यांनी शेतवडीत घरे बांधली आहेत. त्यांनी तळमजल्यावर दुकाने आणि वरील मजल्यावर निवासाची सोय केली आहे. 

मात्र, शनिवारी नदी पात्राबाहेर पडलेले पाणी शेतवडीतील या दुकानातही शिरले असून वरच्या मजल्यावरील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यापैकी १५ महिला व १६ पुरुष मिळून ३१ जणांना आणि एका कुत्र्याला सोमवारी (दि.5) गडहिंग्लज नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने यांत्रिक बोटीने सुरक्षित ठिकाणी हलविले. परंतु, अजूनही शेकडो नागरिक घरातच अडकले आहेत.पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

भांड्याची केली डोली..! गडहिंग्लज विभागात केवळ गडहिंग्लज नगरपालिकेकडेच एकच यांत्रिक बोट उपलब्ध आहे. परंतु, ती देखील गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीच्या महापूरात अडकलेल्यांच्या बचाव मोहिमेत व्यस्त राहिल्याने कोवाडच्या काही धाडसी तरूणांनी मोठे भांडे दोरखंडात  अडकून त्यातून एक महिला व लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुखरूप सुरक्षित स्थळी हलविले. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMaharashtraमहाराष्ट्रfloodपूरRainपाऊस